शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

घरपट्टी वसुलीचा आलेख १६ कोटींवर!

By admin | Updated: June 13, 2016 00:12 IST

पंधरा वर्षे : उद्योग, इमारतींमुळे ग्रामपंचायतींना घसघशीत उत्पन्न

रत्नागिरी : ग्रामीण भागात वसूल करण्यात येणाऱ्या घरपट्टीमध्ये मागील १५ वर्षांमध्ये सुमारे १६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सन २००१-२००२ या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टीची वसुली ९७ टक्के म्हणजेच ५ कोटी ५४ लाख ४६ हजार ३७६ रुपये होती. जिल्हा परिषदेला या घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४४ ग्रामपंचायती असून, ही घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या अत्यल्प ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये रत्नागिरीतील तालुक्यातील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायतींचा समावेश असून, अन्य तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या मोजक्या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न हे लाखो रुपयांचे आहे. त्याचबरोबर बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, सावर्डा, पाचल अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे.दरम्यान, डोंगरदऱ्यात असलेल्या ग्रामपंचायतींना सोयी-सुविधांचा पुरवठा करताना शासनाकडून येणाऱ्या अनुदानावरच अवलंबून रहावे लागते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायतींनाही शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागत आहेत. सन २००१-२००२ या आर्थिक वर्षामध्ये ९७ टक्के म्हणजेच ५ कोटी ५४ लाख ४६ हजार ३७६ रुपये एवढे जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींचे घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न होते. त्यानंतर १० वर्षांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ झाल्याने सन २००९-१० मध्ये ११ कोटी २५ लाख ७८ हजार ५८५ रुपये एवढी ग्रामीण भागातील घरपट्टीची वसुली होती. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी दीड ते दोन कोटी रुपयांनी या घरपट्टीमध्ये वाढ होत गेल्याने सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ही घरपट्टी वसुलीची रक्कम ९२ टक्के म्हणजेच २१ कोटी ७० लाख ८० हजार ११६ रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे १५ वर्षांच्या कालावधीत सुमारे १६ कोटी रुपयांची वाढ घरपट्टीच्या रक्कमेमध्ये झाली. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत वाढलेली कारखानदारी, व्यापार, उद्योग, वाढलेली बांधकामे यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. (शहर वार्ताहर)स्थगिती आदेशामुळे खोडा : केवळ २९ टक्के वसुलीउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ६ एप्रिल २०१५ रोजी परिपत्रक काढून ग्रामपंचायत हद्दीतील इमारतींवर कर आकारणीस स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी कर वसुली बंद केली होती. त्यानंतर पुन्हा ३१ डिसेंबर २०१५ रोजी शासनाने भांडवली मुल्यांवर आधारित कर आकारणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींनी पुन्हा घरपट्टी वसुलीचे काम सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सन २०१५-१६ची घरपट्टी वसुली २९ टक्के म्हणजेच ८ कोटी १७ लाख २४ हजार १७७ रुपये एवढी कमी झाली. चौरस फुटाच्या आधारे करग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील ३ डिसेंबर १९९९चे अधिसूचनेनुसार जमिनीच्या किंवा इमारतीच्या संपूर्ण क्षेत्रफळावर प्रति चौरस फुटाच्या आधारे कर आकारणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. त्यानुसार सन २००१-२००२ पासून ग्रामपंचायतींकडून चौरस फुटाप्रमाणे कर आकारणी सुरु झाली. त्यापूर्वी वार्षिक भाडे मुल्यावर आधारीत कर आकारणी करण्यात येत होती.