शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

Ratnagiri News: कशेडी घाट अपघातांचा ‘हॉटस्पॉट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 15:28 IST

वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक

खेड : आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला ६ जानेवारी रोजी रात्री झालेल्या अपघातानंतर कशेडी घाटातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेला कशेडी घाट ‘हॉटस्पॉट’ ठरत आहे. याठिकाणी वेळीच उपाययोजना न केल्यास अपघातांचे प्रमाण असेच वाढत राहून अनेकांचा बळी जाण्याचा धोका आहे.मुंबई - गोवा महामार्गावर सुमारे तेरा किलोमीटर अंतराचा हा तीव्र उतार व नागमोडी वळणे असलेला घाट आहे. पूर्व-पश्चिम सह्याद्री पर्वताच्या उपरांगामध्ये हा घाट तयार करण्यात आला आहे. चौपदरीकरणात या घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्याचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. अद्यापही हे काम पूर्ण न झाल्याने धाेकादायक मार्गावरूनच वाहने हाकावी लागत आहेत. कशेडी घाटात पोलिस व महामार्ग विभाग प्रशासनाने वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांना ‘डेंजर हॉटस्पॉट’ ठरवले आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालेल्या ठिकाणी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रिक्षा व डंपर यांचा भीषण अपघात झाला होता. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड भरणे येथे डीएडच्या परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाटातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला होता.चौपदरणीकरणात नवीन तयार करण्यात येत असलेल्या बोगद्यामुळे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे, तर दुसरीकडे घाटात तात्पुरते खड्डे भरण्याचे दिखाऊपणाचे काम करण्यात आल्याची ओरड होत आहे. सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अवजड वाहतूक करणारे अनेक वाहनचालक इंधन वाचवण्यासाठी आपले वाहन न्युट्रल करून घाट उतरत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मात्र, यामुळे हे वाहनचालक आपल्या व इतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे, याचबरोबर रखडलेल्या बोगद्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. बोगद्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास हा मार्ग अधिक सुखकर होण्यास मदत होणार आहे.

  • २५ जानेवारी २०१९ रोजी रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
  • घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याच्या कामाची तीस महिन्यांची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास तत्कालीन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.
  • वारंवार होणाऱ्या अपघातांच्या घटनांनंतरही कशेडी घाटात पुरेशी उपाययाेजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतच आहे.
टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात