शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका

By मेहरून नाकाडे | Updated: February 16, 2023 13:10 IST

बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : गेल्या काही वर्षांत बदलत्या हवामानाचा कोकणातील फलोत्पादनाला चांगलाच फटका बसत आहे. यावर्षीही अचानक थंडी गायब होऊन उष्मा प्रचंड वाढला आहे. जिल्ह्याचे मुख्य उत्पादन असलेला आंबा ३४ अंश सेल्सियसपर्यंत तापमान सोसू शकतो. मात्र, सध्या ३५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे आधीच उत्पादन अत्यल्प असलेला आंबा भाजण्याचा धोका निर्माण झाला आहे.गतवर्षी पावसाळा लांबल्याने उशिरापर्यंत पालवी येत होती. केवळ दहा टक्के झाडांनाच नियोजित वेळेत मोहर आला. नोव्हेंबरमध्ये अपेक्षित असलेली थंडी जानेवारीपासून सुरू झाली. तेव्हा मोहर प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहराचा आंबा तयार होऊन दि. १५ मार्चपासून बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र हा आंबा दि. १५ एप्रिलपर्यंतच पुरेल. त्यानंतर बाजारात विक्रीसाठी आंबा उपलब्ध नसेल, असा अंदाज आहे.दुसऱ्या टप्प्यात मोहर नसल्याने यावर्षी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. जानेवारीपासून मोहर येणे सुरू झाले. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे. रात्री थंडी व दिवसा कडकडीत ऊन अशी स्थिती आहे. थंडी पडत असली तरी दव पडत नाही. त्यामुळे मोहर प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. त्यातही जी फळप्रक्रिया सुरू झाली आहे, ती फळे अति उष्म्यामुळे पिवळसर पडून गळण्याची शक्यता आहे. याआधीच्या मोहराचे मोठे फळही भाजून त्यावर काळे डाग पडण्याचा धोका आहे व अशा आंब्याला बाजारात उठाव मिळत नाही.वाढत्या उष्म्याच्या धोक्यासोबतच हवामानातील बदलामुळे थ्रीप्स, तुडतुडा तसेच फळमाशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे बागायतदारांना वेळोवेळी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.

यावर्षी मुळातच आंबा कमी आहे, त्यातच नैसर्गिक बदलांमुळे पीक धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत ३५ अंशापेक्षा अधिक तापमान आहे. आंबा पिकासाठी हे तापमान त्रासदायक ठरणारे आहे. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण कमी न झाल्यास बागायतदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाweatherहवामान