शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Ratnagiri: रिफायनरी प्रकल्पाबाबत आशा बळावल्या, तीन देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 12:04 IST

..तर महाराष्ट्राला फटका

रत्नागिरी : देशाला पेट्रोकेमिकल उद्योगातील प्रमुख निर्यातदार बनवण्याची महत्त्वाकांक्षा असलेला रिफायनरी प्रकल्प गतीने मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जी-२० परिषदेसाठी भारतात आलेले सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार तीन देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांच्या आशा बळावल्या आहेत.राजकारण केले गेल्याने सुमारे चार लाख रुपयांची गुंतवणूक होणार असलेला हा प्रकल्प कोणत्याही हालचाली न होता तब्बल आठ वर्षे रखडत पडला आहे. मात्र, आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रकल्प मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम किनारपट्टीवरच उपयुक्त असल्याने नाणार, बारसूमध्ये हा प्रकल्प होईल, अशी आशा रिफायनरी समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. तीन देशांची समिती या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार असल्याने हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा रिफायनरी समर्थक करत आहेत.

 

  • ६० दशलक्ष टन कच्च्या तेलावर प्रतिवर्षी होणार प्रक्रिया
  • २०१८ एप्रिलमध्ये, अरामकोने रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल कंपनीशी भागीदारी करण्यासाठी केला प्राथमिक करार.

देशाची महत्त्वाकांक्षाभारतात पेट्रोलियम इंधन, उत्पादने, पेट्रोकेमिकल्स उत्पादने यांची मागणी अधिक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीतील जगातील तिसरा सर्वांत मोठा ग्राहक आहे. येत्या काही वर्षात या उत्पादनांची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. त्यामुळे त्यात स्वयंपूर्णता येण्यासाठी महा रिफायनरी प्रकल्पाची गरज आहे. पुढील काही वर्षांत भारताची तेल शुद्धीकरण क्षमता सध्याच्या २५० दशलक्ष टनवरून ४५० दशलक्ष टनपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळेच या प्रकल्पावर आता केंद्र सरकारकडून अधिक लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे.

...तर महाराष्ट्राला फटकाया प्रकल्पासाठी पश्चिम किनारपट्टीवरच जागेची गरज आहे. जर नाणार, बारसूमध्ये हा प्रकल्प झाला नाही तर तो पश्चिम किनारपट्टीवरील अन्य राज्यात नेला जाईल. मात्र, तसे झाल्यास तब्बल चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून बाहेर जाईल. एका बाजुला बेरोजगारी वाढत असताना असा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे अधिक त्रासदायक ठरणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्प