शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा फुटली नवी पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:01 IST

शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होत नाही, हे जसजसे पुढे येत गेले, तसतसा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमधील आनंद मावळला होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले.

ठळक मुद्दे- उदय सामंत आघाडीवर - राजन साळवी समर्थकांनाही खात्री

रत्नागिरी : महाशिवआघाडीच्या चर्चा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा पालवी फुटली आहे. सद्यस्थितीत सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या उदय सामंत यांचे नाव आघाडीवर असून, शिवसेनेच्या प्रमुख मंत्रीपदांमध्ये त्यांचे नाव असल्याची चर्चा आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणारे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनाही मंत्रीपद मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे.शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होत नाही, हे जसजसे पुढे येत गेले, तसतसा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमधील आनंद मावळला होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर राज्यस्तरावरील घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठका सुरू झाल्या. किमान समान कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता नव्याने शिवसैनिकांमध्ये आशेची पालवी फुलली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेने, तर एका मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या चारपैकी दापोलीचे आमदार योगेश कदम यांची ही पहिलीच निवडणूक आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादीकडून दोनदा आणि आता पाचव्यांदा निवडणूक लढवताना पुन्हा शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रीपदाचा अनुभवही आहे. मात्र, त्यांनी याचवर्षी शिवसनेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे योगेश कदम आणि भास्कर जाधव यांची नावे यावर्षी चर्चेत नाहीत.रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे राष्ट्रवादीकडून दोनदा आणि त्यानंतर शिवसेनेकडून सलग दोनवेळा आमदार झाले आहेत. अल्प काळातच त्यांनी मातोश्रीवर आपले वजन निर्माण केले आहे. त्यामुळे केवळ मंत्रीपदासाठीच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील महत्त्वाच्या मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यातील रत्नागिरीसह अन्य काही मतदार संघांची जबाबदारीही सामंत यांच्यावर सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतही सामंत यांनी दिलेले सर्व प्रकारचे योगदान मोठे होते. त्यामुळे सामंत समर्थकांमधून मंत्रीपदाची खात्री व्यक्त केली जात आहे. राजापूर मतदार संघात विजयाची हॅट्ट्रिक करणारे आमदार राजन साळवी यांच्या समर्थकांनाही मंत्रीपदाची आशा आहे. लोकसभा, विधानसभेतील शिवसेनेचा विजय आणि सलग तिसऱ्यांदा मिळालेली आमदारकी यामुळे त्यांचा दावाही पक्का मानला जात आहे. लवकरच ही नावे जाहीर होतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.पालकमंत्री जिल्हाबाह्यच१९९५ ते ९९ या काळात प्रथम रवींद्र माने आणि नंतर रामदास कदम रत्नागिरीचे पालकमंत्री झाले. १९९९पासून २००९पर्यंत हसन मुश्रीफ, बबनराव पाचपुते, अजित पवार, सुनील तटकरे असे जिल्हाबाह्य पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले होते. २००९ ची पाच वर्षे भास्कर जाधव, उदय सामंत हे पालकमंत्री होते. नंतर पुन्हा हे पद जिल्ह्याबाहेरच गेले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी