शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा फुटली नवी पालवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:01 IST

शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होत नाही, हे जसजसे पुढे येत गेले, तसतसा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमधील आनंद मावळला होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले.

ठळक मुद्दे- उदय सामंत आघाडीवर - राजन साळवी समर्थकांनाही खात्री

रत्नागिरी : महाशिवआघाडीच्या चर्चा टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा पालवी फुटली आहे. सद्यस्थितीत सलग चौथ्यांदा आमदार झालेल्या उदय सामंत यांचे नाव आघाडीवर असून, शिवसेनेच्या प्रमुख मंत्रीपदांमध्ये त्यांचे नाव असल्याची चर्चा आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणारे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनाही मंत्रीपद मिळण्याची आशा त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहे.शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होत नाही, हे जसजसे पुढे येत गेले, तसतसा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमधील आनंद मावळला होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर राज्यस्तरावरील घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बैठका सुरू झाल्या. किमान समान कार्यक्रमाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता नव्याने शिवसैनिकांमध्ये आशेची पालवी फुलली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदार संघांमध्ये शिवसेनेने, तर एका मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या चारपैकी दापोलीचे आमदार योगेश कदम यांची ही पहिलीच निवडणूक आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादीकडून दोनदा आणि आता पाचव्यांदा निवडणूक लढवताना पुन्हा शिवसेनेकडून निवडून आले आहेत. त्यांना मंत्रीपदाचा अनुभवही आहे. मात्र, त्यांनी याचवर्षी शिवसनेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे योगेश कदम आणि भास्कर जाधव यांची नावे यावर्षी चर्चेत नाहीत.रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे राष्ट्रवादीकडून दोनदा आणि त्यानंतर शिवसेनेकडून सलग दोनवेळा आमदार झाले आहेत. अल्प काळातच त्यांनी मातोश्रीवर आपले वजन निर्माण केले आहे. त्यामुळे केवळ मंत्रीपदासाठीच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील महत्त्वाच्या मंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यातील रत्नागिरीसह अन्य काही मतदार संघांची जबाबदारीही सामंत यांच्यावर सोपवण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतही सामंत यांनी दिलेले सर्व प्रकारचे योगदान मोठे होते. त्यामुळे सामंत समर्थकांमधून मंत्रीपदाची खात्री व्यक्त केली जात आहे. राजापूर मतदार संघात विजयाची हॅट्ट्रिक करणारे आमदार राजन साळवी यांच्या समर्थकांनाही मंत्रीपदाची आशा आहे. लोकसभा, विधानसभेतील शिवसेनेचा विजय आणि सलग तिसऱ्यांदा मिळालेली आमदारकी यामुळे त्यांचा दावाही पक्का मानला जात आहे. लवकरच ही नावे जाहीर होतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून केली जात आहे.पालकमंत्री जिल्हाबाह्यच१९९५ ते ९९ या काळात प्रथम रवींद्र माने आणि नंतर रामदास कदम रत्नागिरीचे पालकमंत्री झाले. १९९९पासून २००९पर्यंत हसन मुश्रीफ, बबनराव पाचपुते, अजित पवार, सुनील तटकरे असे जिल्हाबाह्य पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला मिळाले होते. २००९ ची पाच वर्षे भास्कर जाधव, उदय सामंत हे पालकमंत्री होते. नंतर पुन्हा हे पद जिल्ह्याबाहेरच गेले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी