शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

घर आहे, पण महावितरणची वीज नाही! रत्नागिरी  जिल्ह्यातील ५,९५१ घरांमध्ये अजूनही अंधारच, धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:54 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात

ठळक मुद्दे भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर

रत्नागिरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर आले आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला मार्च २०१९पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवायची आहे. त्यामुळे यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल समोर यावा, या दृष्टीने केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी भारतीय टपाल विभागाकडे ही जबाबदारी दिली आहे. दळणवळणाचे प्रमुख साधन असलेला आणि संदेशाचे वहन करणारा प्रमुख विभाग म्हणून टपाल विभागाकडे पाहिले जाते. 

ब्रिटीश काळात सुरू झालेल्या या विभागाने अगदी ग्रामीण भागातील जनतेशी एक वेगळे विश्वासाचे आणि सेवेचे नाते जोडले. हे नाते आत्तापर्यंत टिकून आहे. पोस्टाची जिल्ह्यात ५८४ ग्रामीण कार्यालये आहेत. तर ७७ उपकार्यालये आहेत. रत्नागिरी आणि चिपळूण येथे मुख्य कार्यालय (प्रधान डाकघर) आहे. पोस्टमन प्रत्येक गावातील घरात पोहोचला 

आहे. 

ग्रामीण भागातील जनतेशी पोस्टाने जोडलेली नाळ लक्षात घेऊन केंद्रीय ऊर्जा विभागाने अद्याप वीज पोहोचलेली नाही, अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. यासाठी पोस्ट विभागाला जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. 

प्रत्येक गावातील सर्वेक्षणाची जबाबदारी त्या भागातील टपाल कार्यालयाकडे देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण पोस्ट कार्यालयांकडून जलदगतीने काम झाल्याने हे सर्वेक्षण १४ नोव्हेंबरलाच पूर्ण झाले.

जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्याप वीज नसल्याचे दिसून आले तर २५ घरांचा पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. 

स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे उलटून गेली तरी अजूनही जनता रस्ता, वीज यासारख्या सुविधांपासून वंचित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, आता ऊर्जा विभागाने मार्च २०१९पर्यंत सर्व घरांना वीज देण्याची घोषणा केल्याने आता या घरांमध्ये मार्चपूर्वी प्रकाश पसरेल, अशी आशा आता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.

वर्षानुवर्षे वीज नसल्याने अंधारात राहात असलेल्या जिल्ह्यतील या ५,९५१ घरांपैकी २,९७३ कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील तर २,९५३ कुटुंबे दारिद्र्यरेषेवरील आहेत. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण झालेले 

नाही. या कुटुंबांना २०१९पर्यंत वीज मिळेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.

 

जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १,५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्यापही वीज नसल्याचे दिसून आले. टपाल खात्याच्या सर्व्हेक्षणातील जिल्ह्याची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPost Officeपोस्ट ऑफिसRatnagiriरत्नागिरी