शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

घर आहे, पण महावितरणची वीज नाही! रत्नागिरी  जिल्ह्यातील ५,९५१ घरांमध्ये अजूनही अंधारच, धक्कादायक आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:54 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात

ठळक मुद्दे भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर

रत्नागिरी : देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ५,९५१ घरांपर्यंत अजूनही वीज पोहोचलेली नाही. ही घरे विजेअभावी अंधारात चाचपडत आहेत. भारतीय टपाल विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे सत्य समोर आले आहे.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला मार्च २०१९पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवायची आहे. त्यामुळे यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल समोर यावा, या दृष्टीने केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी भारतीय टपाल विभागाकडे ही जबाबदारी दिली आहे. दळणवळणाचे प्रमुख साधन असलेला आणि संदेशाचे वहन करणारा प्रमुख विभाग म्हणून टपाल विभागाकडे पाहिले जाते. 

ब्रिटीश काळात सुरू झालेल्या या विभागाने अगदी ग्रामीण भागातील जनतेशी एक वेगळे विश्वासाचे आणि सेवेचे नाते जोडले. हे नाते आत्तापर्यंत टिकून आहे. पोस्टाची जिल्ह्यात ५८४ ग्रामीण कार्यालये आहेत. तर ७७ उपकार्यालये आहेत. रत्नागिरी आणि चिपळूण येथे मुख्य कार्यालय (प्रधान डाकघर) आहे. पोस्टमन प्रत्येक गावातील घरात पोहोचला 

आहे. 

ग्रामीण भागातील जनतेशी पोस्टाने जोडलेली नाळ लक्षात घेऊन केंद्रीय ऊर्जा विभागाने अद्याप वीज पोहोचलेली नाही, अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. यासाठी पोस्ट विभागाला जेमतेम दीड महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. 

प्रत्येक गावातील सर्वेक्षणाची जबाबदारी त्या भागातील टपाल कार्यालयाकडे देण्यात आली. मात्र, जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण पोस्ट कार्यालयांकडून जलदगतीने काम झाल्याने हे सर्वेक्षण १४ नोव्हेंबरलाच पूर्ण झाले.

जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्याप वीज नसल्याचे दिसून आले तर २५ घरांचा पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. 

स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे उलटून गेली तरी अजूनही जनता रस्ता, वीज यासारख्या सुविधांपासून वंचित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, आता ऊर्जा विभागाने मार्च २०१९पर्यंत सर्व घरांना वीज देण्याची घोषणा केल्याने आता या घरांमध्ये मार्चपूर्वी प्रकाश पसरेल, अशी आशा आता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.

वर्षानुवर्षे वीज नसल्याने अंधारात राहात असलेल्या जिल्ह्यतील या ५,९५१ घरांपैकी २,९७३ कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील तर २,९५३ कुटुंबे दारिद्र्यरेषेवरील आहेत. तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये सर्वेक्षण झालेले 

नाही. या कुटुंबांना २०१९पर्यंत वीज मिळेल, अशी आशा आता निर्माण झाली आहे.

 

जिल्ह्यातील एकूण १,५३१ गावांपैकी १,५२६ गावांमधील ३ लाख ७९ हजार १४२ घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३ लाख ७३ हजार १९१ घरांमध्ये वीज आहे. मात्र, ग्रामीण दुर्गम भागातील ५,९५१ घरांमध्ये अद्यापही वीज नसल्याचे दिसून आले. टपाल खात्याच्या सर्व्हेक्षणातील जिल्ह्याची ही आकडेवारी थक्क करणारी आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPost Officeपोस्ट ऑफिसRatnagiriरत्नागिरी