शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:53 IST

Accident Ratnagiri- महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्याकरिता योजना

आबलोली : महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना उपचाराकरिता योग्य वेळी रुग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना व्यवस्थित न हाताळल्याने जखमी व्यक्तीच्या शरीरास अधिक इजा होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या करिता ह्यगोल्डन अवरह्ण मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस विभागातर्फे हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार आहे.महामार्ग अखत्यारितील महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोल पंप, ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्ग लगतचे गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना मृत्युंजय दूत नावाने संबोधण्यात येणार आहे. या देवदूत व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येणार आहे.महामार्ग सुरक्षा पथकाकडून देणार ओळखपत्रेमहामार्ग तयारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्ग नजीकच्या हॉस्पिटलची नावे पत्ते व संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका १०८ हा दूरध्वनी क्रमांक आहे. याबाबत माहिती देवदुतांना देऊन इतर खासगी व इतर रुग्णालय संलग्न असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूत यांना अपघात प्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी