शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 17:53 IST

Accident Ratnagiri- महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्याकरिता योजना

आबलोली : महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना उपचाराकरिता योग्य वेळी रुग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना व्यवस्थित न हाताळल्याने जखमी व्यक्तीच्या शरीरास अधिक इजा होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या करिता ह्यगोल्डन अवरह्ण मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस विभागातर्फे हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार आहे.महामार्ग अखत्यारितील महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोल पंप, ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्ग लगतचे गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना मृत्युंजय दूत नावाने संबोधण्यात येणार आहे. या देवदूत व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येणार आहे.महामार्ग सुरक्षा पथकाकडून देणार ओळखपत्रेमहामार्ग तयारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्ग नजीकच्या हॉस्पिटलची नावे पत्ते व संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका १०८ हा दूरध्वनी क्रमांक आहे. याबाबत माहिती देवदुतांना देऊन इतर खासगी व इतर रुग्णालय संलग्न असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूत यांना अपघात प्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी