शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

‘तिचा’ मृत्यू संशयास्पद

By admin | Updated: October 16, 2015 22:45 IST

कुडोशीतील घटना : भावांनी मागितला न्याय

खेड : तालुक्यातील कुडोशी गावात भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या रेश्मा शंकर चव्हाण हिचा मोहाने गावातील मंगेश साबळे यांच्या घरी झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप तिचा भाऊ प्रथमेश आणि दिलीप चव्हाण यांनी केला आहे. या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, त्याबाबतचे निवेदन खेडचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.मयत रेश्मा चव्हाण हिचा १० आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद खेड पोलिसात करण्यात आली आहे़ याबाबत तिचा भाऊ प्रथमेश आणि दिलीप चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात तिच्या मृत्यबाबत संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे़ मयत रेश्मा शंकर चव्हाण ही विवाहीत असून, तिला ११ वर्षाचा मुलगा आहे. काही वर्षापूर्वी रेश्मा आणि तिचे भाऊ असे कुटुंब मोहाने येथील मंगेश साबळे यांच्या घरी भाड्याने राहत असत़ त्यावेळी मंगेश साबळे हा रेश्मा हिच्याकडे वाईट नजरेने पाहत असे़ त्याचा संशय आल्याने ते घर या कुटुंबाने सोडले व त्यानंतर ते मोहाने येथील सुरेश कदम यांच्या जनावरांच्या गोठ्यात रहायला गेले. तर त्यांची बहीण रेश्मा ही आपल्या मुलासह मंगेश साबळे यांच्या सांगण्यावरून कुडोशी गावातील एका इसमाच्या घरी भाडयाने राहायला गेली़ त्यानंतर रेश्मा आणि तिचे भाऊ यांचे एकमेकांच्या घरी येणे - जाणे सुरू होते. विशेष म्हणजे मंगेश साबळे याने शनिवार १० आॅक्टोबर २०१५ रोजी रेश्मा हिला त्याच्या मोहाने गावातील घरी बोलावून घेतले होते़ या दिवशी रेश्मा ही मंगेश साबळे यांच्या घरी वास्तव्यास होती़ त्याच दिवशी तिचा मृत्यू सायंकाळी ७.३० वाजता झाल्याची नोंद खेड पोलिसात करण्यात आली आहे़ मात्र, आपले घर हाकेच्या अंतरावर असतानाही मंगेश साबळे याने आम्हाला रात्री ९.३० वाजता कळवले़ यावेळी तुमची बहीण कशीतरी करतेय, असे सांगितले़ तिथे जाऊन पाहिले असता आपली बहीण रेश्मा ही मंगेश साबळे यांच्या घराच्या पडवीच्या दर्शनी भागातील पायरीवर निपचीत पडली होती. आपण पोहोचण्याच्या आतच तिथे मोहाने गावचे पोलीसपाटील प्रवीण काणे उपस्थित होते़ तर काही मिनीटातच कळंबणी रूग्णालयाची रूग्णवाहिका आणि डॉक्टरही हजर झाले़ ही सारी परिस्थिती संशयास्पद असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)निवेदन सादर : चौकशीची मागणीखेड तालुक्यातील कुडोशी येथील रेश्मा चव्हाण हिच्या मृत्यूबाबत तिच्या भावांनी साशंकता व्यक्त केल्याने या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे. आपल्या बहिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याचे निवेदन तिच्या भावांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. या निवेदनाद्वारे या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.तक्रारीला टाळाटाळ१३ आॅक्टोबर २०१५ रोजी याबाबतची तक्रार खेड पोलिसात देण्यास गेलो असता आंबवली बीटच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप केला.