शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

लांजा पूर्व भागाला अवकाळी पावसाने झाेडपले; वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे, कौले गेली उडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:28 IST

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपून काढले.

लांजा : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपून काढले. पावसाचा सर्वाधिक फटका पालू गावाला बसला. वादळी वाऱ्याने येथील अनेक घरांवरील सिमेंटचे पत्रे, कौले उडून गेली आहेत. त्यामुळे आंबा, काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.लांजा तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने पालू गावात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालू गावातील अनेक घरांवरील कौले, सिमेंट पत्रे उडवले. यामध्ये येथील ग्रामस्थ बंटी गाडे यांची दोन आंबा कलमे वादळी वाऱ्यामुळे मोडून पडली.विनोद अवसरे यांच्या घरावरील सुमारे १,२०० कौले उडून गेली आहेत. तसेच सागर गाडे, संदीप गाडे यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेले आहेत. प्रकाश जावडेकर, सुरेश गाडे यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे, अशोक शिवराम खाके यांच्या फार्म हाऊसवरील पूर्ण छप्पर उडून गेले आहे. वादळी वाऱ्यासह काेसळलेल्या पावसामुळे सर्व ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस