शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

अति पावसाने भात पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

दापोली : तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. भात, नाचणी, वरी ही पिके ...

दापोली : तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. भात, नाचणी, वरी ही पिके बहरली असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते; परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी भात पिकाचे नुकसान झाले होते. तीच परिस्थिती यावर्षीही येण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे काही लोक पूर्वापार शेती व्यवसायाकडे वळले आहेत. गेल्या दोन वर्षात मुंबई, पुणे या शहरातील बहुतेक लोकांनी गावी येऊन शेती केली आहे. त्यामुळे कोकणातील भातशेती क्षेत्रात वाढ झाली आहे; पण आता अति मुसळधार पावसाने हे पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

समाधानकारक पावसामुळे भाताचे पीक अतिशय जोमदार आले आहे; परंतु या पावसामुळे दाणा भरण्याची प्रक्रिया रखडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्या भागातील भात शेतीत दाणे भरले नाहीत, अशा शेतीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.