शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

अति पावसाने भात पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

दापोली : तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. भात, नाचणी, वरी ही पिके ...

दापोली : तालुक्यात गेले चार दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. भात, नाचणी, वरी ही पिके बहरली असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते; परंतु नुकत्याच झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी भात पिकाचे नुकसान झाले होते. तीच परिस्थिती यावर्षीही येण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. त्यामुळे काही लोक पूर्वापार शेती व्यवसायाकडे वळले आहेत. गेल्या दोन वर्षात मुंबई, पुणे या शहरातील बहुतेक लोकांनी गावी येऊन शेती केली आहे. त्यामुळे कोकणातील भातशेती क्षेत्रात वाढ झाली आहे; पण आता अति मुसळधार पावसाने हे पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

समाधानकारक पावसामुळे भाताचे पीक अतिशय जोमदार आले आहे; परंतु या पावसामुळे दाणा भरण्याची प्रक्रिया रखडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. ज्या भागातील भात शेतीत दाणे भरले नाहीत, अशा शेतीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.