शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

पावसाचा तडाखा, जिल्ह्यात वीस टक्के भातशेतीला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:02 IST

rain, ratnagirinews शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.

ठळक मुद्देपावसाचा तडाखा, जिल्ह्यात वीस टक्के भातशेतीला झळउभे भात आडवे, कापलेले भात कुजले

रत्नागिरी : शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. ६० टक्के शेतकरी हळवे भात, तर २० टक्के निमगरवे, २० टक्के गरवे भात लागवड करण्यात आली आहे. गरवे, निमगरवे भात कापणीस तयार झाले असून, गरवे भात मात्र तयार होण्याच्या मार्गावर आहे. हळवे भात शेतकऱ्यांनी कापणीस सुरूवात केली होती.

शुक्रवारी शेतकऱ्यांनी कापलेले भात पावसामुळे शनिवारी शेतकऱ्यांना उचलण्याची संधी प्राप्त झाली नाही. शनिवार, रविवारी पाऊस असल्याने दोन दिवस कापलेले भात पाण्यातच राहिले. मळेशेतीत पाणी साचल्याने तयार भात जमीनदोस्त झाल्याने तेही पाण्यात होते. सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे.सोमवारी पाऊस नसला तरी दिवसभर मळभच होते. त्यामुळे भात खाचरातील पाणी काढून टाकून मळेशेतीतील भात काढून अन्यत्र वाळविण्यासाठी टाकण्यात येत होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कातळावर भात वाळविण्यास टाकले होते त्यांनी आहे त्या परिस्थितीत मळणी काढून पेंडा वाळायला टाकला आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास काढून घेतला आहे. भात शेतावरच भिजले तरी कृषी विभाग, लोकप्रतिनिधीकडून याची दखल घेतलेली नाही. कोकणातील शेतकऱ्यांची शेती गुंठ्यात विखुरलेली असल्याने मालकीचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे.-व्ही.एन.गुरव, शेतकरी

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी