शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

पावसाचा तडाखा, जिल्ह्यात वीस टक्के भातशेतीला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:02 IST

rain, ratnagirinews शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.

ठळक मुद्देपावसाचा तडाखा, जिल्ह्यात वीस टक्के भातशेतीला झळउभे भात आडवे, कापलेले भात कुजले

रत्नागिरी : शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. ६० टक्के शेतकरी हळवे भात, तर २० टक्के निमगरवे, २० टक्के गरवे भात लागवड करण्यात आली आहे. गरवे, निमगरवे भात कापणीस तयार झाले असून, गरवे भात मात्र तयार होण्याच्या मार्गावर आहे. हळवे भात शेतकऱ्यांनी कापणीस सुरूवात केली होती.

शुक्रवारी शेतकऱ्यांनी कापलेले भात पावसामुळे शनिवारी शेतकऱ्यांना उचलण्याची संधी प्राप्त झाली नाही. शनिवार, रविवारी पाऊस असल्याने दोन दिवस कापलेले भात पाण्यातच राहिले. मळेशेतीत पाणी साचल्याने तयार भात जमीनदोस्त झाल्याने तेही पाण्यात होते. सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे.सोमवारी पाऊस नसला तरी दिवसभर मळभच होते. त्यामुळे भात खाचरातील पाणी काढून टाकून मळेशेतीतील भात काढून अन्यत्र वाळविण्यासाठी टाकण्यात येत होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कातळावर भात वाळविण्यास टाकले होते त्यांनी आहे त्या परिस्थितीत मळणी काढून पेंडा वाळायला टाकला आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास काढून घेतला आहे. भात शेतावरच भिजले तरी कृषी विभाग, लोकप्रतिनिधीकडून याची दखल घेतलेली नाही. कोकणातील शेतकऱ्यांची शेती गुंठ्यात विखुरलेली असल्याने मालकीचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे.-व्ही.एन.गुरव, शेतकरी

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी