शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पावसाचा तडाखा, जिल्ह्यात वीस टक्के भातशेतीला झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 14:02 IST

rain, ratnagirinews शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.

ठळक मुद्देपावसाचा तडाखा, जिल्ह्यात वीस टक्के भातशेतीला झळउभे भात आडवे, कापलेले भात कुजले

रत्नागिरी : शनिवार व रविवार दोन दिवस सलग दोन दिवस जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तयार भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापलेली भातशेती पाण्यावर तरंगत होती. शिवाय तयार उभे पीक पावसाच्या जोरामुळे जमीनदोस्त झाले आहे.जिल्ह्यात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पादन घेण्यात येते. ६० टक्के शेतकरी हळवे भात, तर २० टक्के निमगरवे, २० टक्के गरवे भात लागवड करण्यात आली आहे. गरवे, निमगरवे भात कापणीस तयार झाले असून, गरवे भात मात्र तयार होण्याच्या मार्गावर आहे. हळवे भात शेतकऱ्यांनी कापणीस सुरूवात केली होती.

शुक्रवारी शेतकऱ्यांनी कापलेले भात पावसामुळे शनिवारी शेतकऱ्यांना उचलण्याची संधी प्राप्त झाली नाही. शनिवार, रविवारी पाऊस असल्याने दोन दिवस कापलेले भात पाण्यातच राहिले. मळेशेतीत पाणी साचल्याने तयार भात जमीनदोस्त झाल्याने तेही पाण्यात होते. सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे.सोमवारी पाऊस नसला तरी दिवसभर मळभच होते. त्यामुळे भात खाचरातील पाणी काढून टाकून मळेशेतीतील भात काढून अन्यत्र वाळविण्यासाठी टाकण्यात येत होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी कातळावर भात वाळविण्यास टाकले होते त्यांनी आहे त्या परिस्थितीत मळणी काढून पेंडा वाळायला टाकला आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडात आलेला घास काढून घेतला आहे. भात शेतावरच भिजले तरी कृषी विभाग, लोकप्रतिनिधीकडून याची दखल घेतलेली नाही. कोकणातील शेतकऱ्यांची शेती गुंठ्यात विखुरलेली असल्याने मालकीचे क्षेत्र कमी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, याची दखल घेणे गरजेचे आहे.-व्ही.एन.गुरव, शेतकरी

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी