शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे नौका पुन्हा बंदरातच उभ्या, मच्छिमारांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 13:21 IST

यंदाच्या हंगामात मासेमारी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला

रत्नागिरी : मुसळधार पावसासह वादळी वारे वाहू लागल्याने त्याचा फटका मच्छिमारांना बसला आहे.  त्यामुळे अनेक नौका बंदरांमध्ये नांगरावर उभ्या असून, मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. वादळी- वाऱ्यासह समुद्र खवळलेला असतानाच मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्याचा परिणाम खोल समुद्रातील मासेमारीवर झाला आहे.  आधीच समुद्रात जाऊनही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत. आता वादळी- वाऱ्यामुळे मासेमारीच ठप्प आहे. नौका बंदरात उभ्या ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र, यंदाच्या हंगामात मासेमारी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे.बदललेल्या वातावरणामुळे मासेमारी नौका समुद्रात न गेल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. मासळी बाजारामध्ये माशांचे प्रमाण कमी झाले आहे. मासे मिळत नसल्याने माशांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfishermanमच्छीमार