शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात उद्या उच्च न्यायालयात सुनावणी 

By संदीप बांद्रे | Updated: August 10, 2023 16:49 IST

चिपळूण : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात व महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांप्रश्नी उद्या, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची ...

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात व महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांप्रश्नी उद्या, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे. गणेशोत्सव जवळ आलेला असताना पनवेल ते वडखळ नाका व रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने न्यायालयाच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण २०११ पासून सुरू आहे. मागील तेरा वर्षात अतिशय दिरंगाईने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम घेतलेल्या कंपन्यांनी चालढकल केल्यामुळे हे काम रखडले. ठेकेदार कंपन्यांवर सरकारने कारवाईचा बडगा उचलल्यानंतर त्यांनी कायदेशीर लढाई सुरू केली. त्यामुळे ठेकेदार कंपन्यांचा अधिकच वेळ हा रस्ता बनवण्यापेक्षा न्यायालयात युक्तिवाद करण्यात गेला. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील आपली हातबलता दाखवून दिली. रस्त्याचे चौपदरीकरण होईल तेव्हा करा परंतु किमान खड्डे तरी बुजवा या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड.ओवेस पेचकर गेली काही वर्ष लढा देत आहेत.सरकार आणि ठेकेदार कंपनीने न्यायालयासमोर महामार्गाचे काम पूर्ण होण्यासंदर्भात अनेक वेळा तारखा दिल्या. परंतु त्या तारखांना अद्याप काम पूर्ण झालेले नाही. गणेशोत्सव जवळ आला आहे. सरकारने महामार्ग खड्डे मुक्त आणि एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण करून हा मार्ग सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तेही अद्याप सुरू झालेले नाही. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांचे फोटो ॲड.पेचकर यांनी आज न्यायलासमोर ठेवले. रस्त्याची एकूण परिस्थिती पाहता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र उपाध्ये यांनी शुक्रवारी सकाळी तातडीची सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गCourtन्यायालय