शहरात, परिसरात नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:47+5:302021-07-02T04:21:47+5:30
रत्नागिरी : शहर परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. वाहनधारकांच्या पाठीचे दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ...

शहरात, परिसरात नागरिक हैराण
रत्नागिरी : शहर परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. वाहनधारकांच्या पाठीचे दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेला जाग कधी येणार, असा प्रश्न केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढतोय
रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कधी होणार, या चिंतेने लोकांना ग्रासले आहेत. तालुक्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असून रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वाढत्या संसर्गाची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे रुग्ण कमी होतील, ही अपेक्षा फाेल ठरली आहे.
नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा
गुहागर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आठ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानाची किंमत १ लाख ३९ हजार ५० रुपये असून, तलाठी आणि ग्रामसेवकांनी सर्व घरांचा पंचनामा केला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणीही नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या
चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.
हळद रोपांचे वाटप
दापोली : आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देवांगमधील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. आमदार कदम यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना हळद लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचे उद्देशाने गावागावात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
खड्ड्यांमुळे वाहनधारकांकडून संताप
चिपळूण : तालुक्यातील पेढांबे येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खोल खड्ड्यात वाहने अडकल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भातशेतीचे नुकसान
देवरूख : पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पांतर्गत कालव्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माखजन पंचक्राेशीतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी माखजन परिसरात खोदाई सुरू आहे.