शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

वाढत्या उष्म्यामुळे हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

चिपळूण : सततच्या वातावरणातील बदलामुळे उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे ...

चिपळूण : सततच्या वातावरणातील बदलामुळे उकाड्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे शीतपेयांचा खप वाढला आहे. थंड पदार्थ सेवनामुळे सर्दी व तापसरी बळावण्याची शक्यता आहे.

४० जणांचे रक्तदान

रत्नागिरी : जागतिक मेमन जमात व ऑल इंडिया मेमन जमात यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी मेमन समाजातर्फे ‘वर्ल्ड मेमन डे’चे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. एकूण ४० रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले. यावेळी मेमन जमातीचे अध्यक्ष आरीफ मेमन, इद्रिस फजलानी, फैय्याज फजलानी आदी उपस्थित होते.

परप्रांतीयांकडून फसवणूक

राजापूर : परराज्यातील आंबा कोकणचा हापूस सांगून विक्री सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाखाली अन्य आंब्याची विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

फुल व्यावसायिक अडचणीत

खेड : लग्नसराईमुळे फुलांचा खप चांगला होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने तसेच कार्यक्रम, मेळावे यांच्यावरही बंदी असल्याने फुलांची विक्री होत नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थती राहिली तर हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा सहभाग

रत्नागिरी : ग्रामस्तरावर कृषी क्षेत्राचे नियोजन करण्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी कोकणातील सर्व ग्रामपंचायतीत प्रथमच ग्राम कृषी विकास समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीमध्ये गावातील प्रगतीशील शेतकरी, लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे वाफाऱ्यांना मागणी

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी लोकांकडून काढा घेणे, गरम वाफा घेण्यात येत आहे. म्हणून जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या वाफाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.