शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
3
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
4
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
5
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
6
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
7
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
8
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
9
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
10
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
11
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
12
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
13
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
14
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
15
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
16
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
17
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
18
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
19
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
20
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:40 IST

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.

ठळक मुद्देतरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार३० ते ४९ वयोगटात अधिक मतदार, यंदा एकूण १३ लाख ०६ हजार २५८ मतदार

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरीचा कार्यभार स्वीकारताच मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, नवमतदारांनी मतदानासाठी पुढे यावे, यादृष्टीने उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही २०१४ च्या तुलनेने अधिक मतदार होते.यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात १३ लाख ०८ हजार ८०० मतदार निश्चित झाले आहेत. यापैकी ६ लाख २६ हजार ९०६ एवढे पुरूष तर ६ लाख ८१ हजार ४८४ एवढी महिला मतदारांची संख्या आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी १२ लाख ३९ हजार २०१ एवढे मतदार होते. यावर्षी त्यात ६९ हजार ५९९ने वाढ झाली आहे.दिनांक १ जानेवारी २०१९च्या अर्हतावर आधारित प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, एकूण मतदारांची संख्या १३ लाख ६ हजार ५२८ इतकी असून, त्यातील ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख ७५ हजार ३७९ इतकी आहे तर त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदार २ लाख ५३ हजार ४४८ इतके आहेत. ८० वर्षावरील मतदारांची संख्या केवळ १.७८ टक्के (५५ हजार ६८९) इतकी आहे.सध्या जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तरूण मतदारांमध्ये जागृतीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार असली तरी २० ते २९ या वयोगटातील तरूण मतदारांची संख्या १४ टक्के म्हणजेच २ लाख २६ हजार २६४ इतकी आहे.नवमतदारांमध्ये आता मतदानाच्या हक्काबाबत जागृती निर्माण होत आहे. २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी आहे. यामुळे नवीन मतदारांमध्ये वाढ होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांची संख्या वाढणार आहे.प्रशासनाचे उपक्रममतदारांमध्ये जागृती वाढावी, तसेच नवमतदारांमध्येही मतदानाच्या हक्काबाबत जाणीव निर्माण व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम रागविले जात आहेत. सध्या जिल्हाभर व्हीव्हीपॅट मशीन तसेच मतदान प्रक्रियेबाबत माहिती व्हावी, यासाठी गावोगावी जावून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.२४ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीची संधीविधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे. या मतदारांना २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत हक्क बजावता येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी