शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

तरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 13:40 IST

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.

ठळक मुद्देतरूण मतदारांच्या हाती, भावी आमदारांची खोती, प्रचाराच्या दिशा बदलणार३० ते ४९ वयोगटात अधिक मतदार, यंदा एकूण १३ लाख ०६ हजार २५८ मतदार

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील पाच मतदार संघातील एकूण मतदारांच्या संख्येपैकी ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७ टक्के असून, त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदारांची संख्या १३.२९ टक्के आहे.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरीचा कार्यभार स्वीकारताच मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, नवमतदारांनी मतदानासाठी पुढे यावे, यादृष्टीने उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही २०१४ च्या तुलनेने अधिक मतदार होते.यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात १३ लाख ०८ हजार ८०० मतदार निश्चित झाले आहेत. यापैकी ६ लाख २६ हजार ९०६ एवढे पुरूष तर ६ लाख ८१ हजार ४८४ एवढी महिला मतदारांची संख्या आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी १२ लाख ३९ हजार २०१ एवढे मतदार होते. यावर्षी त्यात ६९ हजार ५९९ने वाढ झाली आहे.दिनांक १ जानेवारी २०१९च्या अर्हतावर आधारित प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, एकूण मतदारांची संख्या १३ लाख ६ हजार ५२८ इतकी असून, त्यातील ४० ते ४९ वयोगटातील मतदारांची संख्या २ लाख ७५ हजार ३७९ इतकी आहे तर त्याखालोखाल ३० ते ३९ वयोगटातील मतदार २ लाख ५३ हजार ४४८ इतके आहेत. ८० वर्षावरील मतदारांची संख्या केवळ १.७८ टक्के (५५ हजार ६८९) इतकी आहे.सध्या जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तरूण मतदारांमध्ये जागृतीचे काम सुरू आहे. त्यामुळे या मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार असली तरी २० ते २९ या वयोगटातील तरूण मतदारांची संख्या १४ टक्के म्हणजेच २ लाख २६ हजार २६४ इतकी आहे.नवमतदारांमध्ये आता मतदानाच्या हक्काबाबत जागृती निर्माण होत आहे. २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची संधी आहे. यामुळे नवीन मतदारांमध्ये वाढ होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदारांची संख्या वाढणार आहे.प्रशासनाचे उपक्रममतदारांमध्ये जागृती वाढावी, तसेच नवमतदारांमध्येही मतदानाच्या हक्काबाबत जाणीव निर्माण व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम रागविले जात आहेत. सध्या जिल्हाभर व्हीव्हीपॅट मशीन तसेच मतदान प्रक्रियेबाबत माहिती व्हावी, यासाठी गावोगावी जावून प्रात्यक्षिके दाखविली जात आहेत.२४ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणीची संधीविधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी २४ सप्टेंबरपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे. या मतदारांना २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत हक्क बजावता येणार आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी