कोरोनाची तीव्र औषधे आणि ‘प्रोटिनलाॅस’मुळे केस गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:02+5:302021-09-02T05:07:02+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा आजार झाल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. रुग्णाच्या शरीराची हानी ...

Hair loss due to corona drugs and protein loss | कोरोनाची तीव्र औषधे आणि ‘प्रोटिनलाॅस’मुळे केस गळती

कोरोनाची तीव्र औषधे आणि ‘प्रोटिनलाॅस’मुळे केस गळती

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा आजार झाल्यानंतर शरीरातील विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. रुग्णाच्या शरीराची हानी होते. त्यामुळे अशक्तपणा जाणवतोच. पण कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी तीव्र औषधे आणि प्रामुख्याने प्रथिनांसह अन्य जीवनसत्त्वांची होणारी हानी यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही जणांना केस गळण्याची समस्या सुरू होते.

कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूशी लढताना रुग्णामधील विविध जीवनसत्त्वांची हानी होते. त्यातच कोरोनासारखा आजार फुफ्फुसावर आघात करतो. त्याच्यासाठी दीर्घकालीन उपाय घ्यावे लागतात. काही औषधे तीव्र स्वरूपाची असतात. ती दीर्घकाळ घ्यावी लागल्याने त्याचे प्रतिकूल परिणाम शरीराच्या इतर भागावर होतात. कोरोनाबाधित झालेल्या अनेक रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतरही या औषधांच्या माऱ्यामुळे अनेक त्रास होतात. कोरोनाशी लढा देताना शरीरातील विविध जीवनसत्त्वांचा नाश होतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती दुर्बल होते. विशेषत: प्रथिनांची हानी होते. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर अनेकांना केस गळणे, थकवा जाणवणे आदी त्रास होतात. यासाठी अधिक प्रथिने मिळतील असा आहार, भरपूर विश्रांती आणि भरपूर पाणी याची गरज आहे.

तीन महिन्यानंतर गळतात केस

कोरोनातून बरे झाल्यानंतर विविध जीवनसत्त्वांची हानी होत असल्याने तीन महिन्यानंतर काहींचे केस गळण्यास सुरुवात होते. प्रथिनांच्या ऱ्हासामुळे ही समस्या अधिक होते. त्यामुळे ही जीवनसत्त्वे नैसर्गिक घेतली तर उत्तम. पण अधिक प्रमाणात मिळण्यासाठी गोळ्या किंवा पावडरचा वापर करावा लागतो.

...................

हे करा...

शरीराला आलेला थकवा दूर होण्यासाठी परिपूर्ण आहाराची गरज.

प्रथिनयुक्त आहाराचा अधिकाधिक समावेश करावा.

आहारात अंडी, मोड आलेली कडधान्ये, साेयाबीन, दूध यांचा समावेश असावा.

क, ड आदी जीवनसत्त्वे मिळणेही गरजेचे असते. त्यादृष्टीने आहार घ्यावा.

कोरोनानंतरही खूप थकवा जाणवतो. त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्यावी.

शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे

........................

आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा घरगुती उपाय...

- कोरोनातून बरे झाल्यानंतर कोरोनासाठी करण्यात येणाऱ्या उपचाराचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्वांचे प्रमाण घटते.

- कोरोनानंतर काही रुग्णांना यामुळे विलक्षण थकवा जाणवणे, श्वसनात अडसर, खाेकला आदी त्रास होत राहतात.

- काही जणांचे केस प्रथिने घटल्याने गळू लागतात. त्यामुळे काही जण तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्यासाठी घरगुती उपचार करतात.

- परंतु हे उपचारच काही वेळा घातक ठरतात. त्यामुळे या उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कोट

कोरोनाच नव्हे तर कुठल्याही विषाणूशी लढताना शरीरातील पोषक जीवनसत्त्वांची हानी होते. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यानंतर परिपूर्ण आहार घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. तसेच भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घ्यावी.

- डाॅ. ज्ञानेश विटेकर, शल्य चिकित्सक, रत्नागिरी

Web Title: Hair loss due to corona drugs and protein loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.