शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री

By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST

यंत्रणेचे डोळ्यावर हात : कडक कायदे आहेत पण...

रत्नागिरी : राज्यात गुटखाबंदी होऊन बराच कालावधी झाला. त्याबाबत अत्यंत कडक कायदे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळ्यावर हात घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यातील फडणवीस सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत त्याबाबत घोषणाही केली.याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे.गुटखाबंदी प्रामाणिकपणे व्हावी, असे जनतेला वाटते. शासनानेही त्यासाठी कायदा बनवला. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही राज्यातील अन्य भागांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. त्याबाबत पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांनी डोळ्यावर हात ठेवल्याचा आरोपही होत आहे. राज्यातील गुटखा उत्पादन सरकारने बंद केले. परंतु गोवा, कर्नाटक व अन्य राज्यात गुटखा निर्मितीवर बंदी नाही. तेथे उत्पादित गुटखा ट्रकमधून जिल्ह्याच्या विविध भागात येत आहे. रत्नागिरीतही हीच स्थिती आहे.गुटख्याचे काही मोठे स्टॉकिस्ट असल्याचीही चर्चा आहे. याबाबत नुकतीच अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील एका गोदामावर टाकलेली धाड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. शासनाने आदेशाचा चाबूक उगारला की कारवाई करायची, इतरवेळी डोळ्यांवर हात ठेऊन काही घडलेच नाही, असे चित्र निर्माण करायचे, ही स्थिती कधी बदलणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)दुकान तपासणीत गुुटखाच सापडला नाही?राज्यात गेल्या वर्षभरात ७२ हजार दुकानांची तपासणी करून ३२ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात एवढ्या मोेठ्या प्रमाणात दुकानांची तपासणी झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने केवळ दीडशेच दुकानांची तपासणी केली. जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत असताना या तपासणी झालेल्या सर्व दीडशेपैकी एकाही दुकानात एकही गुटख्याचे पाकीट, पाऊच प्रशासनाला सापडला नाही, असा दावा करण्यात आला आहे. सात रूपयांचा गुटखा ५0 रूपयांना विकला जातो. उघडपणे त्याची विक्री होते, मात्र संबंधित खात्यांना त्याची माहिती नसते आणि ते करत असलेल्या तपासणीत तो सापडतही नाही. हीच आश्चर्याची बाब आहे.