शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री

By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST

यंत्रणेचे डोळ्यावर हात : कडक कायदे आहेत पण...

रत्नागिरी : राज्यात गुटखाबंदी होऊन बराच कालावधी झाला. त्याबाबत अत्यंत कडक कायदे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळ्यावर हात घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यातील फडणवीस सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत त्याबाबत घोषणाही केली.याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे.गुटखाबंदी प्रामाणिकपणे व्हावी, असे जनतेला वाटते. शासनानेही त्यासाठी कायदा बनवला. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही राज्यातील अन्य भागांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. त्याबाबत पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांनी डोळ्यावर हात ठेवल्याचा आरोपही होत आहे. राज्यातील गुटखा उत्पादन सरकारने बंद केले. परंतु गोवा, कर्नाटक व अन्य राज्यात गुटखा निर्मितीवर बंदी नाही. तेथे उत्पादित गुटखा ट्रकमधून जिल्ह्याच्या विविध भागात येत आहे. रत्नागिरीतही हीच स्थिती आहे.गुटख्याचे काही मोठे स्टॉकिस्ट असल्याचीही चर्चा आहे. याबाबत नुकतीच अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील एका गोदामावर टाकलेली धाड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. शासनाने आदेशाचा चाबूक उगारला की कारवाई करायची, इतरवेळी डोळ्यांवर हात ठेऊन काही घडलेच नाही, असे चित्र निर्माण करायचे, ही स्थिती कधी बदलणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)दुकान तपासणीत गुुटखाच सापडला नाही?राज्यात गेल्या वर्षभरात ७२ हजार दुकानांची तपासणी करून ३२ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात एवढ्या मोेठ्या प्रमाणात दुकानांची तपासणी झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने केवळ दीडशेच दुकानांची तपासणी केली. जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत असताना या तपासणी झालेल्या सर्व दीडशेपैकी एकाही दुकानात एकही गुटख्याचे पाकीट, पाऊच प्रशासनाला सापडला नाही, असा दावा करण्यात आला आहे. सात रूपयांचा गुटखा ५0 रूपयांना विकला जातो. उघडपणे त्याची विक्री होते, मात्र संबंधित खात्यांना त्याची माहिती नसते आणि ते करत असलेल्या तपासणीत तो सापडतही नाही. हीच आश्चर्याची बाब आहे.