शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

गडनदीचा श्वास कोंडला

By admin | Updated: March 16, 2015 00:17 IST

खडसेंना निवेदन : गाळ उपसण्याची केली मागणी

आरवली : पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे संगमेश्वर तालुक्यातील गडनदी व इतर नद्यांच्या विस्तारात वाढ होते. या नद्यांमध्ये गाळ साचल्याने बहुतांश शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पुराच्या पाण्यामुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत असल्याने गडनदीसह तालुक्यातील नद्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी संगमेश्वर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे केली आहे. गडनदीचा सह्याद्रीच्या खोऱ्यातून उगम झाला आहे. कुंभारखाणी, मुरडव, आरवली, कोंडिवरे, माखजन यागावातून ही नदी करजुवे येथे अरबी समुद्राला मिळते. तसेच तालुक्यातून शास्त्री, सोनवी, असावी, अलकनंदा, काजळी, सप्तलिंंगी, बावनदी या अन्य नद्याही वाहतात. गडनदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका आरवली आणि माखजन येथील बाजारपेठांना बसतो. तसेच अनेक गावांतील नदीकिनाऱ्यावरील शेती वाहून जाते. सखल भाग असल्याने पुराचे पाणी शेतीमध्ये थांबून शेती कुजण्याचेही प्रमाण मोठे असते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. २००५ आणि २०१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत माखजन भागात मोठ्या प्रमाणावर पुरामुळे नुकसान झाले होते. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यावेळी गडनदीतील गाळ उपसा करण्यासाठी निधीची उपलब्धता करुन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप निधी मिळाला नसल्याने गाळ उपशाचे काम झालेले नाही.धामणीकडून संगमेश्वरकडे वाहणाऱ्या नदीमुळे कसब्या जवळची शेती गिळंकृत केली आहे. धामणी, आंबेड खुर्द या भागातही नदीच्या काठावरील शेतीला धोका पोहचला आहे. शास्त्री आणि सोनवीच्या संगमाच्या पुढे असणाऱ्या गावांमध्ये तर नदीच्या बदलत्या प्रवाहाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसत आहे. या नद्यांमध्ये जमा झालेला गाळ उपसा करावा, अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे, पण याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने व वर्षानुवर्षे असाच प्रकार सुरू राहिल्याने शेतकरी जनतेत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.धामापूर आणि काही भागात गडनदीच्या भरतीचे खारे पाणी शेत जमीन क्षेत्रात घुसत असल्यामुळे शेतीचे नुकसान होते. यामुळे खार जमीन प्रतिबंधक उपाय म्हणून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. यासाठी बंदर खात्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शेकासन यांनी सांगितले. (वार्ताहर)गाळात रूतल्या नद्या .....कोकणात चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, राजापूर अशा तालुक्यांमध्ये शहरात पुराच्या पाण्याचा फटका बसतो व त्यामुळे आर्थिक हानी पोहोचते. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा काळात सर्वच स्तरावर आपण ठप्प असतो. हे सारे प्रकार नित्याचेच होत असल्याने व या साऱ्यावर मात करण्यासाठी पूर्वीच्या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी शेकासन यांनी केली आहे.