शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण

By शोभना कांबळे | Updated: June 5, 2023 17:30 IST

ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित

रत्नागिरी : रस्ता, पाणी, जागेवर अतिक्रमण, रस्ता बांधकाम, वैयक्तिक लाभ, निवृत्ती पेन्शन रखडले, हेल्मेट सक्ती अशा विविध यंत्रणांविरोधात प्रकारच्या समस्या मांडण्यासाठी नागरिक सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात पोहोचले.पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, रत्नागिरीचे प्रांत डाॅ. विकास सुर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर तसेच जिल्ह्याच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित होते.या जनता दरबारात एकूण ५३ तक्रारकर्ते उपस्थित होते. गाळ काढणे, तांडा वस्ती योजनेच्या निधीचा दुरूपयोग, रस्ता, पाणी, अनधिकृत बांधकाम, तसेच वैयक्तिक लाभाच्या तक्रारी यावेळी मंत्री सामंत यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या तक्रारींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून समोरासमोर निराकरण केले जात होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत