शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची

By मनोज मुळ्ये | Updated: January 6, 2023 19:09 IST

रत्नागिरीत बिनविरोध निवडी अधिक

मनोज मुळ्येरत्नागिरी : कुठे बिनविरोध, तर कुठे निवडणुकीने गावकारभारी ठरले. त्यापाठोपाठ आता उपकारभारीही आपापल्या खुर्चीवर बसले. आता लोकांना प्रतीक्षा आहे ती गाव विकासाची. यावेळी बहुतांश गावांनी आपले लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडले असल्याने आता ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा केली जात आहे.डिसेंबरमध्ये जिल्ह्यात २२२ पैकी एका ठिकाणच्या बहिष्कारामुळे २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात एकूण ५८ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. १६३ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक झाली. गेल्या आठवड्यात २२१ उपसरपंचांच्या निवडणुका झाल्या असून, आता नव्यांचा कारभार सुरू झाला आहे.

आता करा सुरू कारभार

  • सरपंच ठरले, उपसरपंचही खुर्चीत विराजमान झाले. आता गावची विकासकामे तातडीने हाती घेतली जावीत, अशी लोकांची अपेक्षा आहे.
  • ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तेथे लोकांची अपेक्षा अधिक आहे. लोकांच्या या विश्वासामुळे तेथील सर्वच कारभाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.

सरपंचपदाला महत्त्ववित्त आयोगातून ग्रामपंचायतीला थेट मिळणाऱ्या निधीमुळे आता ग्रामपंचायतींकडे सर्वच पक्ष विशेष लक्ष देत आहेत. त्यातच सरपंच निवडणूक थेट होत असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे.

गटातटाचा कंटाळागेल्या काही वर्षांत राजकारण गावपातळीपर्यंत झिरपले आहे. त्यातून गावागावांत गटातटाचे राजकारण वाढले आहे. त्याला कंटाळूनच यावेळी अनेक गावांनी आपले कारभारी बिनविरोध निवडले आहेत.

बिनविरोध निवडी अधिकजिल्ह्यात २२२ पैकी ६७ सरपंच बिनविरोध निवडून आले. थेट सरपंच निवडणूक, त्यातील वाढलेले राजकीय स्वारस्य, तरीही गावांनी एकमताने सरपंच निश्चित करणे याला खूप महत्त्व आले आहे. सदस्यांच्या १७६६ पैकी तब्बल ११०० सदस्य बिनविरोध निवडून देण्यात आले.

पारदर्शक कारभाराची अपेक्षावित्त आयोगाच्या निधीमुळे ग्रामपंचायतींकडील पैशाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मिळणाऱ्या पूर्ण निधीचा विनियोग विकासकामांसाठीच व्हावा आणि कारभार पारदर्शक असावा, अशी अपेक्षा आता लोक करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच