शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

gram panchayat: कारभारी ठरले, सहकारभारीही विराजले; आता प्रतीक्षा कामांची

By मनोज मुळ्ये | Updated: January 6, 2023 19:09 IST

रत्नागिरीत बिनविरोध निवडी अधिक

मनोज मुळ्येरत्नागिरी : कुठे बिनविरोध, तर कुठे निवडणुकीने गावकारभारी ठरले. त्यापाठोपाठ आता उपकारभारीही आपापल्या खुर्चीवर बसले. आता लोकांना प्रतीक्षा आहे ती गाव विकासाची. यावेळी बहुतांश गावांनी आपले लोकप्रतिनिधी बिनविरोध निवडले असल्याने आता ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतच्या तक्रारी कमी होण्याची अपेक्षा केली जात आहे.डिसेंबरमध्ये जिल्ह्यात २२२ पैकी एका ठिकाणच्या बहिष्कारामुळे २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात एकूण ५८ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. १६३ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक झाली. गेल्या आठवड्यात २२१ उपसरपंचांच्या निवडणुका झाल्या असून, आता नव्यांचा कारभार सुरू झाला आहे.

आता करा सुरू कारभार

  • सरपंच ठरले, उपसरपंचही खुर्चीत विराजमान झाले. आता गावची विकासकामे तातडीने हाती घेतली जावीत, अशी लोकांची अपेक्षा आहे.
  • ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तेथे लोकांची अपेक्षा अधिक आहे. लोकांच्या या विश्वासामुळे तेथील सर्वच कारभाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे.

सरपंचपदाला महत्त्ववित्त आयोगातून ग्रामपंचायतीला थेट मिळणाऱ्या निधीमुळे आता ग्रामपंचायतींकडे सर्वच पक्ष विशेष लक्ष देत आहेत. त्यातच सरपंच निवडणूक थेट होत असल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे.

गटातटाचा कंटाळागेल्या काही वर्षांत राजकारण गावपातळीपर्यंत झिरपले आहे. त्यातून गावागावांत गटातटाचे राजकारण वाढले आहे. त्याला कंटाळूनच यावेळी अनेक गावांनी आपले कारभारी बिनविरोध निवडले आहेत.

बिनविरोध निवडी अधिकजिल्ह्यात २२२ पैकी ६७ सरपंच बिनविरोध निवडून आले. थेट सरपंच निवडणूक, त्यातील वाढलेले राजकीय स्वारस्य, तरीही गावांनी एकमताने सरपंच निश्चित करणे याला खूप महत्त्व आले आहे. सदस्यांच्या १७६६ पैकी तब्बल ११०० सदस्य बिनविरोध निवडून देण्यात आले.

पारदर्शक कारभाराची अपेक्षावित्त आयोगाच्या निधीमुळे ग्रामपंचायतींकडील पैशाचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मिळणाऱ्या पूर्ण निधीचा विनियोग विकासकामांसाठीच व्हावा आणि कारभार पारदर्शक असावा, अशी अपेक्षा आता लोक करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच