शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By मनोज मुळ्ये | Updated: April 29, 2023 17:41 IST

खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प क्षेत्रात सरकारी अधिकाऱ्यांनी जागा घेतल्या आहेत का, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसात ही चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ज्यांनी १३७ गुंठे जमीन घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे, त्या महावितरणच्या अभियंत्याची बदली आपण मुंबईला मुख्यालयात केल्याचेही त्यांनी सांगितले.शनिवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्तावित रिफायनरीबाबत आढावा बैठक झाली. आंदोलक ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत आपण तातडीने मुंबईहून रत्नागिरीत आल्याचे आणि ही बैठक बोलावल्याचे मंत्री सामंत यांनी संगितले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, पोलिस महासंचालक प्रमोद पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अजित यशवंतराव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनांना चर्चा करावयाची असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र काहींना कमी कालावधीमुळे बैठकीला येणे शक्य नव्हते. काहींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते येथे उपस्थित नव्हते. त्यांच्याशी आपण दूरध्वनीवरुन चर्चा केली. ही बैठक जिल्ह्याच्या बाहेर घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता ही बैठक २ किंवा ३ मे रोजी मुंबईत होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.चर्चेसाठी शासनाने एक पाऊल पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आता शासनाने चार पावले पुढे टाकली आहेत. आंदोलकांवर ३५३ कलम (जबरी मारहाण) लावण्यात येणार असल्याची शंका खासदार विनायक राऊत यांनी मांडली आणि ते मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. मात्र हे कलम लावण्यात येणार नसल्याचे सामंत यांनी सांगितले.बारसू भागामध्ये प्रकल्प येणार म्हणून काही जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. त्यात शासकीय अधिकारी पुढे आहेत, असे खासदार राऊत यांनी बैठकीत सांगितले. त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेण्यात आली आहे. कोणीकोणी प्रमाणाबाहेर जागा घेतल्या आहेत, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी ही समिती दाेन दिवसात करेल. अवैध पद्धतीने ही जागा घेण्यात आली असेल तर अशा अधिकाऱ्याला निलंबितची कारवाई सरकारकडून केली जाईल, असेही सामंत म्हणाले.

महावितरणमधील अभियंत्याची तडकाफडकी बदलीमहावितरणच्या राजापूर येथील अभियंता डोंगरे याच्या नावावरच १३७ गुंठे जागा बारसू परिसरात आहे. त्याची तातडीने मुंबई मुख्यालयात बदली करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणआवश्यकता असेल तर या प्रकल्पाबाबतची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही याबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करतील. त्यासाठी ते किंवा कोकण आयुक्त ठाकरे यांच्याशी बोलतील आणि त्यांच्यासमोर याचे सादरीकरण केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन आपण हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.शरद पवार यांना दिली माहितीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एकूणच घडामोडींबाबत जिल्हाधिकरी यांनी माहिती दिली आहे. इतर कोणत्याही पक्षांना याबाबतची माहिती हवी असेल तर त्यांनाही ती दिली जाईल. त्यांच्या मनातील गैरसमज दूर केले जातील, असे मंत्री सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पUday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत