शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ratnagiri Crime: अपहरण करुन सुवर्णकाला लुटले, १४ लाखांचा ऐवज लुबाडून वाटूळ येथे सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:35 IST

गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करत केले अपहरण 

देवरुख : गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करून सराफी दुकानमालकाचे अपहरण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री देवरुख साखरपा मार्गावर घडला. त्यांच्याकडील १४ लाख रुपयांच्या सोन्याच्या चेन आणि २० हजार रुपये लुटून चोरट्यांनी त्यांना मुंबई गोवा महामार्गावर वाटुळ (ता. राजापूर) येथे सोडून दिले आणि चोरटे पळून गेले. देवरुखच्या सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय केतकर यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास सुरू केला आहे.धनंजय केतकर बुधवारी साखरपा येथील संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. तेथून घरी जेवायला येत असल्याचे केतकर यांनी सांगितले आणि ते देवरुखकडे निघाले. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ते वांझोळे येथे आले असता मागून आलेल्या इर्टिगा गाडीने त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला धक्का दिला. त्या गाडीतील एकजण खाली उतरून त्यांच्याकडे नुकसानभरपाई मागू लागला. त्याने केतकर यांना खाली उतरून गाडीचे नुकसान पाहण्याची सूचना केली. त्याच वेळी इर्टिगा गाडीतून अन्य चारजण खाली उतरले. त्यांनी केतकर यांच्या चेहऱ्यावर काळा बुरखा टाकला आणि त्यांना इर्टिगामध्ये कोंबण्यात आले.गाडी देवरुखच्या दिशेने जात असल्याचा अंदाज केतकर यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. गाडीतील तरुणांनी त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून पैशांची मागणी करत १४ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन आणि रोख २० हजार रुपये काढून घेतले. इर्टिगामधील एकाने अज्ञाताला फोन करून ‘आम्ही एकाला ताब्यात घेतले आहे, तुम्ही या,’ असे सांगितले. त्यानंतर केतकर यांना दुसऱ्या गाडीत बसवण्यात आले. दुसऱ्या गाडीतील तरुणांनी केतकर यांना घरी फोन करुन ५ लाख रुपये मार्लेश्वर तिठ्यावर आणून देण्यास धमकावले. केतकर यांनी घरी मुलीला फोन केला. आपण मीटिंगमध्ये असल्याचे सांगत पाच लाख घेऊन यायला सांगितले. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद करण्यात आला.मुलीला संशय आल्याने तिने बापू शेट्ये यांना कळवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दुसऱ्या गाडीने रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास राजापूरच्या दिशेने जात मध्यरात्री १२:३० वाजता महामार्गावर वाटुळ पुलाखाली केतकर यांना सोडून देण्यात आले. यादरम्यान त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.केतकर महामार्गावर आल्यावर राजापूर पोलिसांची गस्तीची गाडी आली. त्या गाडीला हात दाखवून त्यांनी सगळी माहिती सांगितली. राजापूर पोलिसांनी त्यांना देवरुखला पोहोचण्यास मदत केली. ते पहाटे ३ वाजता घरी आले. त्यानंतर पहाटे देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.