शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: अपहरण करुन सुवर्णकाला लुटले, १४ लाखांचा ऐवज लुबाडून वाटूळ येथे सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:35 IST

गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करत केले अपहरण 

देवरुख : गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करून सराफी दुकानमालकाचे अपहरण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री देवरुख साखरपा मार्गावर घडला. त्यांच्याकडील १४ लाख रुपयांच्या सोन्याच्या चेन आणि २० हजार रुपये लुटून चोरट्यांनी त्यांना मुंबई गोवा महामार्गावर वाटुळ (ता. राजापूर) येथे सोडून दिले आणि चोरटे पळून गेले. देवरुखच्या सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय केतकर यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास सुरू केला आहे.धनंजय केतकर बुधवारी साखरपा येथील संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. तेथून घरी जेवायला येत असल्याचे केतकर यांनी सांगितले आणि ते देवरुखकडे निघाले. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ते वांझोळे येथे आले असता मागून आलेल्या इर्टिगा गाडीने त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला धक्का दिला. त्या गाडीतील एकजण खाली उतरून त्यांच्याकडे नुकसानभरपाई मागू लागला. त्याने केतकर यांना खाली उतरून गाडीचे नुकसान पाहण्याची सूचना केली. त्याच वेळी इर्टिगा गाडीतून अन्य चारजण खाली उतरले. त्यांनी केतकर यांच्या चेहऱ्यावर काळा बुरखा टाकला आणि त्यांना इर्टिगामध्ये कोंबण्यात आले.गाडी देवरुखच्या दिशेने जात असल्याचा अंदाज केतकर यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. गाडीतील तरुणांनी त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून पैशांची मागणी करत १४ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन आणि रोख २० हजार रुपये काढून घेतले. इर्टिगामधील एकाने अज्ञाताला फोन करून ‘आम्ही एकाला ताब्यात घेतले आहे, तुम्ही या,’ असे सांगितले. त्यानंतर केतकर यांना दुसऱ्या गाडीत बसवण्यात आले. दुसऱ्या गाडीतील तरुणांनी केतकर यांना घरी फोन करुन ५ लाख रुपये मार्लेश्वर तिठ्यावर आणून देण्यास धमकावले. केतकर यांनी घरी मुलीला फोन केला. आपण मीटिंगमध्ये असल्याचे सांगत पाच लाख घेऊन यायला सांगितले. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद करण्यात आला.मुलीला संशय आल्याने तिने बापू शेट्ये यांना कळवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दुसऱ्या गाडीने रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास राजापूरच्या दिशेने जात मध्यरात्री १२:३० वाजता महामार्गावर वाटुळ पुलाखाली केतकर यांना सोडून देण्यात आले. यादरम्यान त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.केतकर महामार्गावर आल्यावर राजापूर पोलिसांची गस्तीची गाडी आली. त्या गाडीला हात दाखवून त्यांनी सगळी माहिती सांगितली. राजापूर पोलिसांनी त्यांना देवरुखला पोहोचण्यास मदत केली. ते पहाटे ३ वाजता घरी आले. त्यानंतर पहाटे देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.