शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Ratnagiri Crime: अपहरण करुन सुवर्णकाला लुटले, १४ लाखांचा ऐवज लुबाडून वाटूळ येथे सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:35 IST

गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करत केले अपहरण 

देवरुख : गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करून सराफी दुकानमालकाचे अपहरण करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी रात्री देवरुख साखरपा मार्गावर घडला. त्यांच्याकडील १४ लाख रुपयांच्या सोन्याच्या चेन आणि २० हजार रुपये लुटून चोरट्यांनी त्यांना मुंबई गोवा महामार्गावर वाटुळ (ता. राजापूर) येथे सोडून दिले आणि चोरटे पळून गेले. देवरुखच्या सह्याद्रीनगर येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय केतकर यांच्याबाबत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास सुरू केला आहे.धनंजय केतकर बुधवारी साखरपा येथील संदेश ऊर्फ बापू शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. तेथून घरी जेवायला येत असल्याचे केतकर यांनी सांगितले आणि ते देवरुखकडे निघाले. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास ते वांझोळे येथे आले असता मागून आलेल्या इर्टिगा गाडीने त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला धक्का दिला. त्या गाडीतील एकजण खाली उतरून त्यांच्याकडे नुकसानभरपाई मागू लागला. त्याने केतकर यांना खाली उतरून गाडीचे नुकसान पाहण्याची सूचना केली. त्याच वेळी इर्टिगा गाडीतून अन्य चारजण खाली उतरले. त्यांनी केतकर यांच्या चेहऱ्यावर काळा बुरखा टाकला आणि त्यांना इर्टिगामध्ये कोंबण्यात आले.गाडी देवरुखच्या दिशेने जात असल्याचा अंदाज केतकर यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. गाडीतील तरुणांनी त्यांच्या डोक्याला काहीतरी वस्तू लावून पैशांची मागणी करत १४ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या चेन आणि रोख २० हजार रुपये काढून घेतले. इर्टिगामधील एकाने अज्ञाताला फोन करून ‘आम्ही एकाला ताब्यात घेतले आहे, तुम्ही या,’ असे सांगितले. त्यानंतर केतकर यांना दुसऱ्या गाडीत बसवण्यात आले. दुसऱ्या गाडीतील तरुणांनी केतकर यांना घरी फोन करुन ५ लाख रुपये मार्लेश्वर तिठ्यावर आणून देण्यास धमकावले. केतकर यांनी घरी मुलीला फोन केला. आपण मीटिंगमध्ये असल्याचे सांगत पाच लाख घेऊन यायला सांगितले. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद करण्यात आला.मुलीला संशय आल्याने तिने बापू शेट्ये यांना कळवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान दुसऱ्या गाडीने रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास राजापूरच्या दिशेने जात मध्यरात्री १२:३० वाजता महामार्गावर वाटुळ पुलाखाली केतकर यांना सोडून देण्यात आले. यादरम्यान त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.केतकर महामार्गावर आल्यावर राजापूर पोलिसांची गस्तीची गाडी आली. त्या गाडीला हात दाखवून त्यांनी सगळी माहिती सांगितली. राजापूर पोलिसांनी त्यांना देवरुखला पोहोचण्यास मदत केली. ते पहाटे ३ वाजता घरी आले. त्यानंतर पहाटे देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.