शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By मेहरून नाकाडे | Updated: July 25, 2023 18:46 IST

शासनाच्या उदासीनतेबद्दल संताप 

रत्नागिरी : आंबा, काजू बागायतदारांना सरसकट कर्जमाफी देत सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२५) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भर पावसात आंबा-काजू बागायतदारांनी मोर्चा काढला तसेच दिवसभर धरणे आंदोलनही केले. आंदोलनात सहभागी संख्येवरून बागायतदारांची एकजूट निदर्शनास आली.‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा’, अशा विविध घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बागायतदारांच्या प्रश्नाबाबत शासन, प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.जिल्ह्यातील बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरे करा, कोकणतील प्रदूषण कारखाने बंद झाले पाहिजे, फळपिक विम्याचे निकष बदलावे यांसह अनेक मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदारांनी मोर्चा काढला होता. बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष दिवसभर धरणे आंदोलनही केले. २०१४-१५ या वर्षांपासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, शेतकऱ्यांचा कृषिपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावेत, शेतकऱ्यांना खते व औषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान देण्यात यावे, आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी यांसह अन्य मागण्या बागायतदारांनी केल्या आहेत.यावेळी प्रकाश साळवी, कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मन्सूर काझी, सचीन आचरेकर, किरण तोडणकर, अशोक भाटकर मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन