शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By मेहरून नाकाडे | Updated: July 25, 2023 18:46 IST

शासनाच्या उदासीनतेबद्दल संताप 

रत्नागिरी : आंबा, काजू बागायतदारांना सरसकट कर्जमाफी देत सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२५) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भर पावसात आंबा-काजू बागायतदारांनी मोर्चा काढला तसेच दिवसभर धरणे आंदोलनही केले. आंदोलनात सहभागी संख्येवरून बागायतदारांची एकजूट निदर्शनास आली.‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा’, अशा विविध घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बागायतदारांच्या प्रश्नाबाबत शासन, प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.जिल्ह्यातील बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरे करा, कोकणतील प्रदूषण कारखाने बंद झाले पाहिजे, फळपिक विम्याचे निकष बदलावे यांसह अनेक मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदारांनी मोर्चा काढला होता. बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष दिवसभर धरणे आंदोलनही केले. २०१४-१५ या वर्षांपासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, शेतकऱ्यांचा कृषिपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावेत, शेतकऱ्यांना खते व औषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान देण्यात यावे, आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी यांसह अन्य मागण्या बागायतदारांनी केल्या आहेत.यावेळी प्रकाश साळवी, कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मन्सूर काझी, सचीन आचरेकर, किरण तोडणकर, अशोक भाटकर मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन