शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Ratnagiri: पैशाच्या मागणीला कंटाळून प्रेयसीचा गळा दाबून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 11:48 IST

लांजा : वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील ४८ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याची घटना ...

लांजा : वारंवार पैशाची मागणी करत असल्याच्या त्रासाला कंटाळून लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील ४८ वर्षीय प्रेयसीचा खून केल्याची घटना तब्बल अडीच महिन्यांनी शुक्रवारी उघडकीस आली आहे. वैशाली चंद्रकांत रांबाडे (४८) असे मृत प्रेयसीचे नाव असून, पाेलिसांनी तिच्या खुनाप्रकरणी राजेंद्र गाेविंद गुरव (५३, रा. काेंड्ये-गुरववाडी) याला ताब्यात घेतले आहे.याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कोंड्ये येथील वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचे याच राजेंद्र गोविंद गुरव याच्याशी प्रेमसंबंध हाेते. त्यानंतर वैशाली रांबाडे ही राजेंद्र गुरव याच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होती. वारंवार हाेणाऱ्या पैशाच्या मागणीला राजेंद्र वैतागला होता. या दाेघांमध्ये दि. २८ जुलै रोजी रात्री मोबाइलवर जवळपास एक तास बोलणे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान ती कुवे येथे डॉक्टरकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती.

मात्र, डाॅक्टरकडे न जाता ती राजेंद्र गुरव याच्यासाेबत दि. २९ जुलै रोजी कुवे येथे जंगलमय भागात गेली हाेती. राजेंद्र यांच्या मनामध्ये धगधगत असलेल्या रागातून त्याने वैशालीच्या मानेवर काठीने जोरदार प्रहार केला. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर ताे घरी निघून आला.वैशाली ही रात्र झाली तरी डॉक्टरकडून घरी न आल्याने तिच्या पतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या पतीने दि. ३० जुलै रोजी लांजा पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. त्यानंतर राजेंद्र गुरव याची चाैकशी केली असता काहीच हाती लागले नाही.

तब्बल अडीच महिन्यांनंतर तिच्या पतीने दि. ११ ऑक्टोबर रोजी लांजा पोलिस स्थानकात राजेंद्र गुरव याने तिला फूस लावून पळवून नेत गायब केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी राजेंद्र गुरव याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी रात्री त्याची पोलिस कोठडीत चौकशी केली असता त्याने आपण वैशाली हिचा कुवे येथील जंगलमय भागात खून केल्याचे सांगितले.उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सहायक पोलिस फौजदार भालचंद्र रेवणे, पोलिस हवालदार जितेंद्र कदम, पोलिस हवालदार अरविंद कांबळे, पोलिस हवालदार दिनेश आखाडे, पाेलिस काॅन्स्टेबल नितेश राणे, कॉन्स्टेबल सुयोग वाडकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रियांका कांबळे, चालक कॉन्स्टेबल चेतन घडशी, चालक सहायक पाेलिस फाैजदार संजय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात झाडाझुडपांमध्ये असलेल्या वस्तू शोधून काढल्या. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.खरे बाेलतच नव्हतापत्नी घरी न आल्याने पतीने फिर्यादीत राजेंद्र गुरव याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली. राजेंद्र गुरव याच्यावर संशयाची सुई असल्याने त्याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र, ताे पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नव्हता. तसेच तो काहीच खरे बोलत नसल्याने पोलिसही हतबल झाले होते.

वारंवार विचारणाविवाहित महिला बेपत्ता झाल्यानंतरही तिचा शाेध लागत नसल्याने नातेवाईक व कुटुंबाकडून वारंवार विचारणा केली जात होती. मात्र, तिच्या बेपत्ता हाेण्यामागचे कारण समाेर येत नसल्याने पाेलिस चक्रावून गेले हाेते.

जंगलात सापडले साहित्यसंशयित राजेंद्र गुरव याला सोबत घेऊन पोलिसांनी कुवे येथील जंगलमय भागातील घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी मृत महिलेच्या वस्तू, साडी, ब्लाऊज पाेलिसांच्या हाती लागले. हे सर्व तिचेच असल्याचे तिच्या पतीने ओळखले. त्यावरून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनास्थळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी