शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा बंदोबस्त करा; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण 

By शोभना कांबळे | Updated: October 5, 2023 15:37 IST

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अखेर गोळप येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी गुरुवार (दि. ५) पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांंच्या या उपोषणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे.शासनाला या प्रश्नाचे गांभीर्य कळावे, यासाठी अविनाश काळे यांनी या मागणीसाठी डिसेंबर २२ मध्ये जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक गावांमधील सुमारे २०० शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर २ आॅगस्ट २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महत्त्वाची सभा घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासाठी निवेदनेही पाठविण्यात आली. मात्र, याबाबत कुणालाच दखल घेण्याची गरज वाटलेली नाही.वनखात्याच्या १९२६ या हेल्पलाइनवर शेकडो फोन करूनही प्राणी न्यायला माणसे आलेली नाहीत. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. शेती बागायती भयमुक्त करणे शेतकऱ्यांचा हक्क आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशाराही काळे यांनी या निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.वानर, माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वानर, माकडे घरावरील नळे, पत्रे फोडणे, पाईप तोडणे, घरात शिरून नासधूस करणे. माणसांच्या अंगावरही धावून येण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या ३५ वर्षांत वानर, माकडे मारणे बंद झाल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर भटकी जनावरे, श्वान यांचाही जीवघेणा उपद्रव वाढला आहे. या समस्यांनी शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी अविनाश काळे यांनी गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष या उपोषणात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी