शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा बंदोबस्त करा; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण 

By शोभना कांबळे | Updated: October 5, 2023 15:37 IST

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अखेर गोळप येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी गुरुवार (दि. ५) पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांंच्या या उपोषणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे.शासनाला या प्रश्नाचे गांभीर्य कळावे, यासाठी अविनाश काळे यांनी या मागणीसाठी डिसेंबर २२ मध्ये जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक गावांमधील सुमारे २०० शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर २ आॅगस्ट २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महत्त्वाची सभा घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासाठी निवेदनेही पाठविण्यात आली. मात्र, याबाबत कुणालाच दखल घेण्याची गरज वाटलेली नाही.वनखात्याच्या १९२६ या हेल्पलाइनवर शेकडो फोन करूनही प्राणी न्यायला माणसे आलेली नाहीत. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. शेती बागायती भयमुक्त करणे शेतकऱ्यांचा हक्क आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशाराही काळे यांनी या निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.वानर, माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वानर, माकडे घरावरील नळे, पत्रे फोडणे, पाईप तोडणे, घरात शिरून नासधूस करणे. माणसांच्या अंगावरही धावून येण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या ३५ वर्षांत वानर, माकडे मारणे बंद झाल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर भटकी जनावरे, श्वान यांचाही जीवघेणा उपद्रव वाढला आहे. या समस्यांनी शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी अविनाश काळे यांनी गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष या उपोषणात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी