शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:01 IST

विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.

ठळक मुद्दे७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

राजापूर : विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.पावसाळा संपला की साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात उष्ण वारे वाहू लागले की, गंगा आगमनाचे वेध लागतात. गेले काही दिवस उष्ण वारे वाहू लागल्याने गंगेच्या आगमनाची चाहूल लागली होती. यापुर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन व्हायचे त्यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती. मात्र, अलिकडच्या तिच्या आगमन व गमन या नियमित कालखंडाला छेद गेला आहे.

काही वर्षे तर ती सलग आली होती आणि तिच्या वास्तव्याला कालावधीही खूपच लांबला होता. दिनांक ३१ आॅगस्ट २०१६ साली गंगा अवतीर्ण झाल्यानंतर ७ मे २०१७ मध्ये अंतर्धान पावली होती. त्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटत असतानाच गंगेचे पुन्हा आगमन झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्वात मोठे असणारे काशिकुंड तुडुंब जलाशयाने भरले आहे. गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील वाढला आहे.निसर्गाच्या रचनेत किंवा भूगर्भात काही घडामोडी घडल्या तरीही गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातच्या भूज, कांडला परिसराला भूकंपाचा मोठा दणका बसला होता. त्यावेळी गंगेचे आगमन झाले होते. ज्यावेळी त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासहित जगाला बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती. 

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी