शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:01 IST

विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.

ठळक मुद्दे७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

राजापूर : विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. गंगेच्या आगमनाची वार्ता समजताच अनेकांनी गंगातीर्थ क्षेत्री जाऊन स्नानाचा आनंद लुटला.पावसाळा संपला की साधारणपणे नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात उष्ण वारे वाहू लागले की, गंगा आगमनाचे वेध लागतात. गेले काही दिवस उष्ण वारे वाहू लागल्याने गंगेच्या आगमनाची चाहूल लागली होती. यापुर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन व्हायचे त्यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती. मात्र, अलिकडच्या तिच्या आगमन व गमन या नियमित कालखंडाला छेद गेला आहे.

काही वर्षे तर ती सलग आली होती आणि तिच्या वास्तव्याला कालावधीही खूपच लांबला होता. दिनांक ३१ आॅगस्ट २०१६ साली गंगा अवतीर्ण झाल्यानंतर ७ मे २०१७ मध्ये अंतर्धान पावली होती. त्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटत असतानाच गंगेचे पुन्हा आगमन झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्वात मोठे असणारे काशिकुंड तुडुंब जलाशयाने भरले आहे. गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहदेखील वाढला आहे.निसर्गाच्या रचनेत किंवा भूगर्भात काही घडामोडी घडल्या तरीही गंगेचे आगमन झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातच्या भूज, कांडला परिसराला भूकंपाचा मोठा दणका बसला होता. त्यावेळी गंगेचे आगमन झाले होते. ज्यावेळी त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासहित जगाला बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती. 

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी