शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

गणेशोत्सव प्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे

By शोभना कांबळे | Updated: September 20, 2023 16:42 IST

शाेभना कांबळे, रत्नागिरी मंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती ...

शाेभना कांबळे, रत्नागिरीमंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती बघू आणि किती नको, असे त्याला झाले आहे. आता शनिवारपर्यंत सकाळी आणि सायंकाळी सुवासिक वातावरणात बाप्पाच्या आरतीचा सोहळा होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी त्याचे आवडते उकडीचे मोदक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे आता पाच दिवस त्याच्या आगमनाने घर भारल्यासारखे होणार आहे, हे सांगायलाच नको. या काळात गणपती उत्सवासाठी पै-पाहुणे यानिमित्ताने येतातच. पण, गणपती बघण्यासाठी आजुबाजुचे किंवा मित्र परिवारही येत असतो. या साऱ्यांमुळे घर भरलेले असते. म्हणूनच अशा या उत्सवांमध्ये विविध चांगल्या संवादांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने चांगली संधी असते. या संधीचा उपयोग गणेशभक्तांनी घेतल्यास सामाजिक प्रबोधनाचे काम आपोआपच होईल.लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव किंवा सार्वजनिक शिवजयंती उत्सव करण्यामागचा उद्देश हाच होता की, या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळीबाबतचे प्रबोधन घडवून आणण्यास मदत होईल, याच उद्देशाने हे दोन उत्सव सुरू झाले आणि त्यामागे असलेला प्रबोधनाचा हेतू साध्यही झाला. त्यामुळे भारतीयांमध्ये परकीय शक्तींविराेधात लढा देण्याची मानसिकता त्यावेळच्या भारतीयांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच इंग्रजांविरोधात उभ्या राहिलेल्या या चळवळीला व्यापक स्वरूप आले. त्यामुळे इंग्रजांच्या हातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी मोठा स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. तत्कालीन देशभक्तांच्या पाठीमागे सर्वच नागरिक उभे राहिल्याने स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला, हे सांगायलाच नको.

म्हणूनच हे उत्सव आताही प्रबोधनाचे व्यासपीठ बनले, तर अनेक चांगले संदेश आजुबाजुला देता येतील.काही सार्वजनिक गणेशोत्सवात चांगल्या उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक सार्वजनिक मंडळे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवतानाच लोकाेपयोगी, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, शैक्षणिक शिबिरे आदी उपक्रम ठेवल्याने परिसरातील अनेक गरजू लोकांना याचा उपयोग होतो. शाळेतल्या मुलांसाठी विविध स्पर्धा ठेवल्या जातात. या निबंध, वक्तृत्व आणि अन्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुले पुढे येतात. त्यामुळे गणेशोत्सव हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ न ठरता खऱ्या अर्थाने बुद्धीच्या देवतेच्या साक्षीने विविध प्रबोधनाच्या कार्याचे व्यासपीठ करायला हवे. काही सरकारी विभाग अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती ठेवतात. मात्र, श्रीगणेशाच्या मूर्तीची नुसती पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून शेवटच्या दिवशी विसर्जन केले जाते. अशा ठिकाणी या कार्यालयाने आपल्या कार्यालयाच्या योजनांबरोबरच अन्य शासकीय योजनांचे फलक लावले तर ते खऱ्या अर्थाने फलद्रूप ठरतील. महिलांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित करता येण्यासारखे आहेत.

घरगुती गणेशाेत्सवाच्या माध्यमातूनही आपल्या भारतीय आदर्श संस्कृतीचे पोस्टर अथवा अन्य सजावटीतून करता येणे शक्य आहे. या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आलेले आहेत. केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमात रमण्याऐवजी त्यांनी आपल्या गावाच्या - वाडीच्या समस्या जाणून घ्याव्यात. आपल्या परिसरात विकासाची कोणती कामे सुरू आहेत, कोणती आवश्यक आहेत, याबाबतही चर्चा करायला हवी. गणेशोत्सवात दिवसभर व्यग्र राहण्याऐवजी या उत्सवासाठी आल्यानंतर ही सुटीही गावाच्या विकासाच्या दृष्टीने सार्थकी लावता येईल. नाहीतर गणेशोत्सवासाठी चाकरमानी लगबगीने येतात आणि विसर्जन झाले की, तेवढ्याच लगबगीने कामाच्या ठिकाणी परतात. काही तर वर्षानेच पुन्हा उत्सवासाठी येतात. त्यामुळे गणेशोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन बनविण्याऐवजी विधायक कार्यासाठी व्यासपीठ करण्यासाठी गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेतला तर उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे म्हणावेसे वाटते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव