शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गणेशोत्सव प्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे

By शोभना कांबळे | Updated: September 20, 2023 16:42 IST

शाेभना कांबळे, रत्नागिरी मंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती ...

शाेभना कांबळे, रत्नागिरीमंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती बघू आणि किती नको, असे त्याला झाले आहे. आता शनिवारपर्यंत सकाळी आणि सायंकाळी सुवासिक वातावरणात बाप्पाच्या आरतीचा सोहळा होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी त्याचे आवडते उकडीचे मोदक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे आता पाच दिवस त्याच्या आगमनाने घर भारल्यासारखे होणार आहे, हे सांगायलाच नको. या काळात गणपती उत्सवासाठी पै-पाहुणे यानिमित्ताने येतातच. पण, गणपती बघण्यासाठी आजुबाजुचे किंवा मित्र परिवारही येत असतो. या साऱ्यांमुळे घर भरलेले असते. म्हणूनच अशा या उत्सवांमध्ये विविध चांगल्या संवादांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने चांगली संधी असते. या संधीचा उपयोग गणेशभक्तांनी घेतल्यास सामाजिक प्रबोधनाचे काम आपोआपच होईल.लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव किंवा सार्वजनिक शिवजयंती उत्सव करण्यामागचा उद्देश हाच होता की, या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळीबाबतचे प्रबोधन घडवून आणण्यास मदत होईल, याच उद्देशाने हे दोन उत्सव सुरू झाले आणि त्यामागे असलेला प्रबोधनाचा हेतू साध्यही झाला. त्यामुळे भारतीयांमध्ये परकीय शक्तींविराेधात लढा देण्याची मानसिकता त्यावेळच्या भारतीयांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच इंग्रजांविरोधात उभ्या राहिलेल्या या चळवळीला व्यापक स्वरूप आले. त्यामुळे इंग्रजांच्या हातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी मोठा स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. तत्कालीन देशभक्तांच्या पाठीमागे सर्वच नागरिक उभे राहिल्याने स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला, हे सांगायलाच नको.

म्हणूनच हे उत्सव आताही प्रबोधनाचे व्यासपीठ बनले, तर अनेक चांगले संदेश आजुबाजुला देता येतील.काही सार्वजनिक गणेशोत्सवात चांगल्या उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक सार्वजनिक मंडळे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवतानाच लोकाेपयोगी, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, शैक्षणिक शिबिरे आदी उपक्रम ठेवल्याने परिसरातील अनेक गरजू लोकांना याचा उपयोग होतो. शाळेतल्या मुलांसाठी विविध स्पर्धा ठेवल्या जातात. या निबंध, वक्तृत्व आणि अन्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुले पुढे येतात. त्यामुळे गणेशोत्सव हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ न ठरता खऱ्या अर्थाने बुद्धीच्या देवतेच्या साक्षीने विविध प्रबोधनाच्या कार्याचे व्यासपीठ करायला हवे. काही सरकारी विभाग अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती ठेवतात. मात्र, श्रीगणेशाच्या मूर्तीची नुसती पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून शेवटच्या दिवशी विसर्जन केले जाते. अशा ठिकाणी या कार्यालयाने आपल्या कार्यालयाच्या योजनांबरोबरच अन्य शासकीय योजनांचे फलक लावले तर ते खऱ्या अर्थाने फलद्रूप ठरतील. महिलांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित करता येण्यासारखे आहेत.

घरगुती गणेशाेत्सवाच्या माध्यमातूनही आपल्या भारतीय आदर्श संस्कृतीचे पोस्टर अथवा अन्य सजावटीतून करता येणे शक्य आहे. या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आलेले आहेत. केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमात रमण्याऐवजी त्यांनी आपल्या गावाच्या - वाडीच्या समस्या जाणून घ्याव्यात. आपल्या परिसरात विकासाची कोणती कामे सुरू आहेत, कोणती आवश्यक आहेत, याबाबतही चर्चा करायला हवी. गणेशोत्सवात दिवसभर व्यग्र राहण्याऐवजी या उत्सवासाठी आल्यानंतर ही सुटीही गावाच्या विकासाच्या दृष्टीने सार्थकी लावता येईल. नाहीतर गणेशोत्सवासाठी चाकरमानी लगबगीने येतात आणि विसर्जन झाले की, तेवढ्याच लगबगीने कामाच्या ठिकाणी परतात. काही तर वर्षानेच पुन्हा उत्सवासाठी येतात. त्यामुळे गणेशोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन बनविण्याऐवजी विधायक कार्यासाठी व्यासपीठ करण्यासाठी गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेतला तर उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे म्हणावेसे वाटते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव