शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव प्रबोधनाचे व्यासपीठ व्हावे

By शोभना कांबळे | Updated: September 20, 2023 16:42 IST

शाेभना कांबळे, रत्नागिरी मंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती ...

शाेभना कांबळे, रत्नागिरीमंगळवारी विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे घराघरात आगमन हाेताच, गणेशभक्तांच्या उत्साहाला भरते आले. बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवताना त्याला किती बघू आणि किती नको, असे त्याला झाले आहे. आता शनिवारपर्यंत सकाळी आणि सायंकाळी सुवासिक वातावरणात बाप्पाच्या आरतीचा सोहळा होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी त्याचे आवडते उकडीचे मोदक तयार केले जाणार आहेत. त्यामुळे आता पाच दिवस त्याच्या आगमनाने घर भारल्यासारखे होणार आहे, हे सांगायलाच नको. या काळात गणपती उत्सवासाठी पै-पाहुणे यानिमित्ताने येतातच. पण, गणपती बघण्यासाठी आजुबाजुचे किंवा मित्र परिवारही येत असतो. या साऱ्यांमुळे घर भरलेले असते. म्हणूनच अशा या उत्सवांमध्ये विविध चांगल्या संवादांची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने चांगली संधी असते. या संधीचा उपयोग गणेशभक्तांनी घेतल्यास सामाजिक प्रबोधनाचे काम आपोआपच होईल.लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव किंवा सार्वजनिक शिवजयंती उत्सव करण्यामागचा उद्देश हाच होता की, या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येणाऱ्या लोकांमध्ये स्वातंत्र्य चळवळीबाबतचे प्रबोधन घडवून आणण्यास मदत होईल, याच उद्देशाने हे दोन उत्सव सुरू झाले आणि त्यामागे असलेला प्रबोधनाचा हेतू साध्यही झाला. त्यामुळे भारतीयांमध्ये परकीय शक्तींविराेधात लढा देण्याची मानसिकता त्यावेळच्या भारतीयांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच इंग्रजांविरोधात उभ्या राहिलेल्या या चळवळीला व्यापक स्वरूप आले. त्यामुळे इंग्रजांच्या हातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी मोठा स्वातंत्र्य संग्राम उभा राहिला. तत्कालीन देशभक्तांच्या पाठीमागे सर्वच नागरिक उभे राहिल्याने स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला, हे सांगायलाच नको.

म्हणूनच हे उत्सव आताही प्रबोधनाचे व्यासपीठ बनले, तर अनेक चांगले संदेश आजुबाजुला देता येतील.काही सार्वजनिक गणेशोत्सवात चांगल्या उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक सार्वजनिक मंडळे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवतानाच लोकाेपयोगी, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छता मोहीम, शैक्षणिक शिबिरे आदी उपक्रम ठेवल्याने परिसरातील अनेक गरजू लोकांना याचा उपयोग होतो. शाळेतल्या मुलांसाठी विविध स्पर्धा ठेवल्या जातात. या निबंध, वक्तृत्व आणि अन्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुले पुढे येतात. त्यामुळे गणेशोत्सव हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ न ठरता खऱ्या अर्थाने बुद्धीच्या देवतेच्या साक्षीने विविध प्रबोधनाच्या कार्याचे व्यासपीठ करायला हवे. काही सरकारी विभाग अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती ठेवतात. मात्र, श्रीगणेशाच्या मूर्तीची नुसती पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून शेवटच्या दिवशी विसर्जन केले जाते. अशा ठिकाणी या कार्यालयाने आपल्या कार्यालयाच्या योजनांबरोबरच अन्य शासकीय योजनांचे फलक लावले तर ते खऱ्या अर्थाने फलद्रूप ठरतील. महिलांच्या विकासाच्या दृष्टीने अनेक उपक्रम आयोजित करता येण्यासारखे आहेत.

घरगुती गणेशाेत्सवाच्या माध्यमातूनही आपल्या भारतीय आदर्श संस्कृतीचे पोस्टर अथवा अन्य सजावटीतून करता येणे शक्य आहे. या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने आलेले आहेत. केवळ मनोरंजनाच्या कार्यक्रमात रमण्याऐवजी त्यांनी आपल्या गावाच्या - वाडीच्या समस्या जाणून घ्याव्यात. आपल्या परिसरात विकासाची कोणती कामे सुरू आहेत, कोणती आवश्यक आहेत, याबाबतही चर्चा करायला हवी. गणेशोत्सवात दिवसभर व्यग्र राहण्याऐवजी या उत्सवासाठी आल्यानंतर ही सुटीही गावाच्या विकासाच्या दृष्टीने सार्थकी लावता येईल. नाहीतर गणेशोत्सवासाठी चाकरमानी लगबगीने येतात आणि विसर्जन झाले की, तेवढ्याच लगबगीने कामाच्या ठिकाणी परतात. काही तर वर्षानेच पुन्हा उत्सवासाठी येतात. त्यामुळे गणेशोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन बनविण्याऐवजी विधायक कार्यासाठी व्यासपीठ करण्यासाठी गणेश मंडळांनी आणि गणेशभक्तांनी पुढाकार घेतला तर उत्सवाचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल, असे म्हणावेसे वाटते. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanesh Mahotsavगणेशोत्सव