शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

सागरी सुरक्षारक्षकांचे भवितव्य असुरक्षित ? रत्नागिरी जिल्ह्यात ६४ कर्मचारी पाच महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:17 IST

मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानंतर व अतिरेकी कारवायांचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्यात ६२ सागरी सुरक्षारक्षक व त्यांच्यावर देखरेखीसाठी २ पर्यवेक्षक अशी ६४ जणांची नियुक्ती केली. मात्र, सागरी सुरक्षितता करणाऱ्या या ६४ जणांना गेल्या ५ महिन्यांपासून एकूण ६८ लाख ५३ हजार ७९६ रुपये एवढे वेतनच दिलेले नाही.

ठळक मुद्दे- अतिरेकी कारवायांसाठी सागरी मार्गाचा वापर झाल्यानेच सागरी सुरक्षिततेला शासनाकडून अधिक महत्व दिले जात आहे.- रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर अनेक पॉर्इंट्सवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक- ६२ सागरी सुरक्षारक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी २ सागरी पर्यवेक्षकांचीही नियुक्ती- महत्त्वाच्या सागरी केंद्रांवर सुरक्षारक्षकांची नजर

रत्नागिरी : मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानंतर व अतिरेकी कारवायांचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्यात ६२ सागरी सुरक्षारक्षक व त्यांच्यावर देखरेखीसाठी २ पर्यवेक्षक अशी ६४ जणांची नियुक्ती केली. मात्र, सागरी सुरक्षितता करणाऱ्या या ६४ जणांना गेल्या ५ महिन्यांपासून एकूण ६८ लाख ५३ हजार ७९६ रुपये एवढे वेतनच दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक भवितव्य धोक्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून, आर्थिक सुरक्षिततेविना त्यांच्याकडून सागरीसुरक्षा कशी काय होणार, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.देशात आतापर्यंत जे काही हल्ले झाले, त्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला गेल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील बॉम्ब स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटकेही सागरी मार्गाने मुंबईत पोहोचली होती, तर त्यानंतर मुंबईतील अतिरेकी हल्ल्यासाठीही अतिरेक्यांनी सागरी मार्गाचाच वापर केला. याची केंद्र व राज्य शासनाने गंभीर दखल घेतली. त्यानंतर देशातील सागरी सुरक्षिततेला अधिक महत्व देण्यात आले. प्रत्येक सागरी जिल्ह्यात सागरीगस्ती नौकाही देण्यात आल्या.सागरी सुरक्षिततेअंतर्गत राज्य सरकारने मत्स्य विभागामार्फत जिल्ह्यात सागरी सुरक्षिततेसाठी ६२ सुरक्षारक्षक व २ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत झाले. कारण सागरी सुरक्षितता ही देशाच्या सार्वभौमत्त्वासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, नियुक्ती करण्यात आलेल्या या ६४ कर्मचाऱ्यांना जुलै २०१७पासून अद्यापपर्यंत म्हणजेच गेल्या पाच महिन्यांचे वेतनच मिळालेले नाही.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा १४ लाख रुपये खर्च येतो. शासनाकडे निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. सागरी सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित वेतनाबाबत मत्स्य आयुक्त व सचिवांना रत्नागिरीच्या सहाय्यक संचालकांनी प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षितेतेचे महत्त्वाचे पॉर्इंट्स असलेल्या रानवी वेलदूर, पडवे, गणपतीपुळे, नेवरे, नांदिवडे, जयगड, सैतवडे, काळबादेवी, जांभारी, मिºया बंदर, गोळप, भगवती बंदर, रनपार, वेशवी, वेळास, दाभोळ, केळशी, माडबन, साखरीनाटे, आंबोळगड, पूर्णगड, मुसाकाझी आदी ठिकाणी हे ६४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील या सागरी सुरक्षकांच्या प्रलंबित वेतनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. याबाबत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, आमदार भास्कर जाधव तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. लवकरात लवकर हे प्रलंबित वेतन मिळणे सागरी सुरक्षारक्षकांना अपेक्षित आहे.

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी