शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

सागरी सुरक्षारक्षकांचे भवितव्य असुरक्षित ? रत्नागिरी जिल्ह्यात ६४ कर्मचारी पाच महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 17:17 IST

मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानंतर व अतिरेकी कारवायांचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्यात ६२ सागरी सुरक्षारक्षक व त्यांच्यावर देखरेखीसाठी २ पर्यवेक्षक अशी ६४ जणांची नियुक्ती केली. मात्र, सागरी सुरक्षितता करणाऱ्या या ६४ जणांना गेल्या ५ महिन्यांपासून एकूण ६८ लाख ५३ हजार ७९६ रुपये एवढे वेतनच दिलेले नाही.

ठळक मुद्दे- अतिरेकी कारवायांसाठी सागरी मार्गाचा वापर झाल्यानेच सागरी सुरक्षिततेला शासनाकडून अधिक महत्व दिले जात आहे.- रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर अनेक पॉर्इंट्सवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक- ६२ सागरी सुरक्षारक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी २ सागरी पर्यवेक्षकांचीही नियुक्ती- महत्त्वाच्या सागरी केंद्रांवर सुरक्षारक्षकांची नजर

रत्नागिरी : मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानंतर व अतिरेकी कारवायांचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने जिल्ह्यात ६२ सागरी सुरक्षारक्षक व त्यांच्यावर देखरेखीसाठी २ पर्यवेक्षक अशी ६४ जणांची नियुक्ती केली. मात्र, सागरी सुरक्षितता करणाऱ्या या ६४ जणांना गेल्या ५ महिन्यांपासून एकूण ६८ लाख ५३ हजार ७९६ रुपये एवढे वेतनच दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक भवितव्य धोक्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून, आर्थिक सुरक्षिततेविना त्यांच्याकडून सागरीसुरक्षा कशी काय होणार, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.देशात आतापर्यंत जे काही हल्ले झाले, त्यासाठी सागरी मार्गाचा वापर केला गेल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील बॉम्ब स्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटकेही सागरी मार्गाने मुंबईत पोहोचली होती, तर त्यानंतर मुंबईतील अतिरेकी हल्ल्यासाठीही अतिरेक्यांनी सागरी मार्गाचाच वापर केला. याची केंद्र व राज्य शासनाने गंभीर दखल घेतली. त्यानंतर देशातील सागरी सुरक्षिततेला अधिक महत्व देण्यात आले. प्रत्येक सागरी जिल्ह्यात सागरीगस्ती नौकाही देण्यात आल्या.सागरी सुरक्षिततेअंतर्गत राज्य सरकारने मत्स्य विभागामार्फत जिल्ह्यात सागरी सुरक्षिततेसाठी ६२ सुरक्षारक्षक व २ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत झाले. कारण सागरी सुरक्षितता ही देशाच्या सार्वभौमत्त्वासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, नियुक्ती करण्यात आलेल्या या ६४ कर्मचाऱ्यांना जुलै २०१७पासून अद्यापपर्यंत म्हणजेच गेल्या पाच महिन्यांचे वेतनच मिळालेले नाही.

या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा १४ लाख रुपये खर्च येतो. शासनाकडे निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. सागरी सुरक्षारक्षकांच्या प्रलंबित वेतनाबाबत मत्स्य आयुक्त व सचिवांना रत्नागिरीच्या सहाय्यक संचालकांनी प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी सुरक्षितेतेचे महत्त्वाचे पॉर्इंट्स असलेल्या रानवी वेलदूर, पडवे, गणपतीपुळे, नेवरे, नांदिवडे, जयगड, सैतवडे, काळबादेवी, जांभारी, मिºया बंदर, गोळप, भगवती बंदर, रनपार, वेशवी, वेळास, दाभोळ, केळशी, माडबन, साखरीनाटे, आंबोळगड, पूर्णगड, मुसाकाझी आदी ठिकाणी हे ६४ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील या सागरी सुरक्षकांच्या प्रलंबित वेतनाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाचे लक्ष वेधण्याची मागणी आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. याबाबत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, आमदार भास्कर जाधव तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे. लवकरात लवकर हे प्रलंबित वेतन मिळणे सागरी सुरक्षारक्षकांना अपेक्षित आहे.

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी