शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री उदय सामंतांची ग्वाही

By मनोज मुळ्ये | Updated: June 10, 2023 13:52 IST

'राज्यात रत्नागिरी जिल्हा विकासात अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्नशील'

रत्नागिरी : राज्यात रत्नागिरी जिल्हा विकासात अग्रेसर रहावा, यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील विविध गावांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.रत्नागिरी शहरातील भाट्ये येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी बांधकाम सभापती महेश म्हाप, सरपंच प्रीती भाटकर, सुरेंद्र भाटकर, दिलीप भाटकर, विवेक सुर्वे, नंदा मुरकर, तुषार साळवी, पराग भाटकर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, या बहुउद्देशीय सभागृहाचा फायदा गावातील बचत गट तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल. गावातील बचत गट जी उत्पादने तयार करतील, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे. भाट्ये गावाच्या विकासासाठी सुमारे ४ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.भाट्येनंतर त्यांनी फणसोप येथेही विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गावामध्ये विकास कामे करताना राजकीय मतभेद दूर ठेवावेत. या गावासाठी नळपाणी योजना, रस्ते, स्मशानभूमी, साकव या कामांसाठी सुमारे दहा कोटींचा निधी मंजूर केल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.मंत्री सामंत यांनी भाट्ये, फणसोप, कोळंबे या ठिकाणच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती हाेती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत