शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

एकीचे बळ मिळते फळ, तब्बल ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत फुलविला मळा; करतायत विविध प्रकारची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:08 IST

रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे.

महेरुन नाकाडे

रत्नागिरी : एका व्यक्तीने शक्य नाही, परंतु ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत नऊ एकर क्षेत्रावर मळा फुलविला आहे. कोकणच्या लाल मातीत स्ट्राॅबेरी, रंगीत कलिंगडे, कांदा, बटाटा, लसूण, सिमला मिरची, टोमॅटोसहित अन्य पालेभाज्या, फळभाज्यांचे भरघोस उत्पन्न घेता येते, हे धामणी (संगमेश्वर) येथील श्रीमंत बळीराजा सेंद्रिय शेतकरी गटाने सिद्ध केले आहे. दुबई, साैदी अरेबिया येथे कलिंगड निर्यात करणारा जिल्ह्यातील पहिला गट ठरला आहे.

खरीप हंगामात भात, नागली उत्पन्नानंतर मोजकेचे शेतकरी कुळीथ व भाज्यांचे उत्पन्न घेतात, उर्वरित क्षेत्र मोकळेच असते. त्यामुळे धामणीतील २१ शेतकऱ्यांनी एकत्रित येत रब्बी हंगामात शेती करण्याचे निश्चित केले. सुरुवातीला कुळीथ, पालेभाज्यांचे उत्पन्न घेतले. हळूहळू जम बसल्यानंतर गावातील अन्य शेतकरीही त्यांच्यासमवेत जोडले गेले. सध्या ३५० शेतकरी एकत्रित येऊन नऊ एकर क्षेत्रावर विविध प्रकारची शेती करीत आहेत. भुईमूग, मका, आले, वांगी, पावटा, भेंडी, कोथिंबीर, झेंडू, गवार, दुधी भोपळा, पडवळ, काकडी, दोडका आदी विविध प्रकारचे उत्पन्न घेत आहेत. आंबा, काजू बागायतीही आहे.

कलिंगड उत्पादनावर त्यांचा विशेष भर आहे. दोन वर्षांपूर्वी ३० टन कलिंगड त्यांनी दुबई, साैदी अरेबिया येथे निर्यात केले होते. दोन वर्षे कोरोनाचा फटका बसला; मात्र कलिंगड महोत्सव आयोजित केला होता, त्याला चांगला प्रतिसाद लाभला. गतवर्षी स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रयोग त्यांनी केला आणि लाल मातीत चांगल्या दर्जाची स्ट्राॅबेरी घेता येते, हे सिद्ध केले. यावर्षी या गटाने पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवड टाळली असून कांदा, लसूण, बटाटा लागवड केली आहे. ते शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत आहेत.

नऊ प्रकारची कलिंगडे

गटातर्फे नऊ प्रकारची कलिंगडे लागवड करीत आहेत. रंगीत कलिंगड उत्पादन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. २० ते २२ किलो वजनाचे कलिंगड उत्पादन घेत असून, निर्यातीसाठी विशेष मागणी होत आहे. कलिंगडसह सर्व प्रकारच्या भाज्या व अन्य उत्पादन विक्रीसाठी धामणी येथे दोन व चिपळूण किंवा रत्नागिरीत एक स्टाॅल लावण्याचा पर्यायही त्यांनी काढला आहे. सलग दोन वर्षे लाॅकडाऊनचा फटका बसला. गावात काेरोना रुग्ण सापडल्याने कलिंगड विक्री न झाल्याने माल सडला, नुकसान खूप झाले. तरीही न डगमगता गटाची वाटचाल सक्रिय आहे.

सेंद्रिय शेतीवर भर

रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. पालापाचोळ्यापासून तयार केलेले गांडूळ खत, तसेच जीवांमृताचा वापर ते करीत आहे. येथे आधुनिक तंत्राचा अवलंब केला आहे. उत्पादन व दर्जा दोन्हीबाबतीत गटाने ठसा उमटविला आहे. या गटाने शेतकरी कंपनीचीही स्थापना केली आहे आहे. अन्य शेतकऱ्यांनाही गटातर्फे लागवडीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. दर्जामुळे विक्री सोपी झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी