शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एकीचे बळ मिळते फळ, तब्बल ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत फुलविला मळा; करतायत विविध प्रकारची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:08 IST

रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे.

महेरुन नाकाडे

रत्नागिरी : एका व्यक्तीने शक्य नाही, परंतु ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत नऊ एकर क्षेत्रावर मळा फुलविला आहे. कोकणच्या लाल मातीत स्ट्राॅबेरी, रंगीत कलिंगडे, कांदा, बटाटा, लसूण, सिमला मिरची, टोमॅटोसहित अन्य पालेभाज्या, फळभाज्यांचे भरघोस उत्पन्न घेता येते, हे धामणी (संगमेश्वर) येथील श्रीमंत बळीराजा सेंद्रिय शेतकरी गटाने सिद्ध केले आहे. दुबई, साैदी अरेबिया येथे कलिंगड निर्यात करणारा जिल्ह्यातील पहिला गट ठरला आहे.

खरीप हंगामात भात, नागली उत्पन्नानंतर मोजकेचे शेतकरी कुळीथ व भाज्यांचे उत्पन्न घेतात, उर्वरित क्षेत्र मोकळेच असते. त्यामुळे धामणीतील २१ शेतकऱ्यांनी एकत्रित येत रब्बी हंगामात शेती करण्याचे निश्चित केले. सुरुवातीला कुळीथ, पालेभाज्यांचे उत्पन्न घेतले. हळूहळू जम बसल्यानंतर गावातील अन्य शेतकरीही त्यांच्यासमवेत जोडले गेले. सध्या ३५० शेतकरी एकत्रित येऊन नऊ एकर क्षेत्रावर विविध प्रकारची शेती करीत आहेत. भुईमूग, मका, आले, वांगी, पावटा, भेंडी, कोथिंबीर, झेंडू, गवार, दुधी भोपळा, पडवळ, काकडी, दोडका आदी विविध प्रकारचे उत्पन्न घेत आहेत. आंबा, काजू बागायतीही आहे.

कलिंगड उत्पादनावर त्यांचा विशेष भर आहे. दोन वर्षांपूर्वी ३० टन कलिंगड त्यांनी दुबई, साैदी अरेबिया येथे निर्यात केले होते. दोन वर्षे कोरोनाचा फटका बसला; मात्र कलिंगड महोत्सव आयोजित केला होता, त्याला चांगला प्रतिसाद लाभला. गतवर्षी स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रयोग त्यांनी केला आणि लाल मातीत चांगल्या दर्जाची स्ट्राॅबेरी घेता येते, हे सिद्ध केले. यावर्षी या गटाने पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवड टाळली असून कांदा, लसूण, बटाटा लागवड केली आहे. ते शेतीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत आहेत.

नऊ प्रकारची कलिंगडे

गटातर्फे नऊ प्रकारची कलिंगडे लागवड करीत आहेत. रंगीत कलिंगड उत्पादन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. २० ते २२ किलो वजनाचे कलिंगड उत्पादन घेत असून, निर्यातीसाठी विशेष मागणी होत आहे. कलिंगडसह सर्व प्रकारच्या भाज्या व अन्य उत्पादन विक्रीसाठी धामणी येथे दोन व चिपळूण किंवा रत्नागिरीत एक स्टाॅल लावण्याचा पर्यायही त्यांनी काढला आहे. सलग दोन वर्षे लाॅकडाऊनचा फटका बसला. गावात काेरोना रुग्ण सापडल्याने कलिंगड विक्री न झाल्याने माल सडला, नुकसान खूप झाले. तरीही न डगमगता गटाची वाटचाल सक्रिय आहे.

सेंद्रिय शेतीवर भर

रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. पालापाचोळ्यापासून तयार केलेले गांडूळ खत, तसेच जीवांमृताचा वापर ते करीत आहे. येथे आधुनिक तंत्राचा अवलंब केला आहे. उत्पादन व दर्जा दोन्हीबाबतीत गटाने ठसा उमटविला आहे. या गटाने शेतकरी कंपनीचीही स्थापना केली आहे आहे. अन्य शेतकऱ्यांनाही गटातर्फे लागवडीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. दर्जामुळे विक्री सोपी झाली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी