शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:41 IST

हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १३३ कोटी ९६ लाख ७९ हजार ९०० रूपयांचा विमा आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा१०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा स्वयंचलित हवामान केंद्रामुळे निराशा टळणार

रत्नागिरी : हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १३३ कोटी ९६ लाख ७९ हजार ९०० रूपयांचा विमा आहे.महाराष्ट्र शासनाने २०१७-१८साठी फळपीक विमा योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत सरासरीपेक्षा कमी - अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केले.

जिल्ह्यातील १३ हजार ११ शेतकऱ्यांनी १२ हजार ४३९.०२ हेक्टर क्षेत्रासाठी आंबा पिकाकरिता फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. १२४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८ रूपयांचा विमा असून, त्याकरिता शेतकऱ्यांनी ७ कोटी ९ लाख २ हजार ९७५ रूपयांचा प्रीमियम भरला आहे. १२६७ शेतकऱ्यांनी काजू पिकासाठी फळपीक विमा घेतला होता. १२३४.०९ हेक्टर क्षेत्रासाठी ९ कोटी ५८ लाख २० हजार ८९२ रूपयांचा विमा असून, शेतकऱ्यांनी ४९ लाख ५९ हजार ९१० रूपये इतके प्रीमियमचे पैसे भरले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबापीक लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.

शासनाने प्रायोगिक तत्त्वावर हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०१२ साली जाहीर केली होती. यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

उत्पादन घसरले. शिवाय दर्जावरही परिणाम झाला आहे. एकाच हंगामात तीन ऋतूंचा प्रत्यय जिल्हावासीयांनी घेतला आहे. अवेळचा पाऊस, शिवाय गारपिटीचाही अनुभव शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत घेतला आहे. मार्चमध्ये ४० अंश सेल्सियस इतक्या उच्चत्तम तापमानाची नोंद झाली होती. या शिवाय नीचांक तापामानाचा परिणाम पिकावर झाला आहे.दि. १ जानेवारी ते दि. १५ एप्रिलअखेर अवेळचा पाऊस, दि. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीअखेर नीचांक तापमान, दि. १५ मार्च ते ३१ मेपर्यंत उच्चांक तापमान, तर गारपिटीसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल आदी निकष निश्चित केले होते. या निकषाच्या आधारावर विमा देण्यात आला आहे.१०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा २०१२-१३ या आर्थिक वर्षात १५०० शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत २ कोटी ३२ लाख रूपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला होता. २०१४ - १५मध्ये १७७६ शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख १८ हजार ६२९, तर २०१५ - १६मध्ये ३,०१२ शेतकऱ्यांना १२ कोटी १७ लाख २३२ रूपये, तसेच २०१६ - १७मध्ये जिल्ह्यातील १० हजार ६०३ लाभार्थी शेतकऱ्यांना १६ कोटी २७ लाखांचा परतावा देण्यात आला होता.स्वयंचलित हवामान केंद्रामुळे निराशा टळणारसरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेत सहभागी होतात. मात्र, चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी येणारी निराशा आता स्वयंचलित हवामान केंद्रामुळे टळणार आहे. जिल्ह्यात एकूण ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी