शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:41 IST

हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १३३ कोटी ९६ लाख ७९ हजार ९०० रूपयांचा विमा आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील १४ हजार शेतकऱ्यांना फळपीक विमा१०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा स्वयंचलित हवामान केंद्रामुळे निराशा टळणार

रत्नागिरी : हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत २०१७ - १८साठी जिल्ह्यातील १४ हजार २७८ शेतकऱ्यांनी एकूण १३ हजार ६७३.११ हेक्टर क्षेत्राचा विमा घेतला आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख ६२ हजार ८८४ रूपये शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला असून, जिल्ह्यासाठी एकूण १३३ कोटी ९६ लाख ७९ हजार ९०० रूपयांचा विमा आहे.महाराष्ट्र शासनाने २०१७-१८साठी फळपीक विमा योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत सरासरीपेक्षा कमी - अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण जाहीर केले.

जिल्ह्यातील १३ हजार ११ शेतकऱ्यांनी १२ हजार ४३९.०२ हेक्टर क्षेत्रासाठी आंबा पिकाकरिता फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. १२४ कोटी ३८ लाख ५९ हजार ८ रूपयांचा विमा असून, त्याकरिता शेतकऱ्यांनी ७ कोटी ९ लाख २ हजार ९७५ रूपयांचा प्रीमियम भरला आहे. १२६७ शेतकऱ्यांनी काजू पिकासाठी फळपीक विमा घेतला होता. १२३४.०९ हेक्टर क्षेत्रासाठी ९ कोटी ५८ लाख २० हजार ८९२ रूपयांचा विमा असून, शेतकऱ्यांनी ४९ लाख ५९ हजार ९१० रूपये इतके प्रीमियमचे पैसे भरले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबापीक लागवड करण्यात आली असून, ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.

शासनाने प्रायोगिक तत्त्वावर हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०१२ साली जाहीर केली होती. यावर्षी बदलत्या हवामानाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे.

उत्पादन घसरले. शिवाय दर्जावरही परिणाम झाला आहे. एकाच हंगामात तीन ऋतूंचा प्रत्यय जिल्हावासीयांनी घेतला आहे. अवेळचा पाऊस, शिवाय गारपिटीचाही अनुभव शेतकऱ्यांनी फेब्रुवारीत घेतला आहे. मार्चमध्ये ४० अंश सेल्सियस इतक्या उच्चत्तम तापमानाची नोंद झाली होती. या शिवाय नीचांक तापामानाचा परिणाम पिकावर झाला आहे.दि. १ जानेवारी ते दि. १५ एप्रिलअखेर अवेळचा पाऊस, दि. १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीअखेर नीचांक तापमान, दि. १५ मार्च ते ३१ मेपर्यंत उच्चांक तापमान, तर गारपिटीसाठी दि. १ जानेवारी ते ३० एप्रिल आदी निकष निश्चित केले होते. या निकषाच्या आधारावर विमा देण्यात आला आहे.१०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा २०१२-१३ या आर्थिक वर्षात १५०० शेतकऱ्यांना विमा योजनेंतर्गत २ कोटी ३२ लाख रूपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली होती. २०१३-१४ या आर्थिक वर्षात १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख रूपयांचा परतावा देण्यात आला होता. २०१४ - १५मध्ये १७७६ शेतकऱ्यांना ४ कोटी ८८ लाख १८ हजार ६२९, तर २०१५ - १६मध्ये ३,०१२ शेतकऱ्यांना १२ कोटी १७ लाख २३२ रूपये, तसेच २०१६ - १७मध्ये जिल्ह्यातील १० हजार ६०३ लाभार्थी शेतकऱ्यांना १६ कोटी २७ लाखांचा परतावा देण्यात आला होता.स्वयंचलित हवामान केंद्रामुळे निराशा टळणारसरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. दरवर्षी जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेत सहभागी होतात. मात्र, चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी येणारी निराशा आता स्वयंचलित हवामान केंद्रामुळे टळणार आहे. जिल्ह्यात एकूण ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी