मृत कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी २५ टन लाकूड दिले मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST2021-05-05T04:51:30+5:302021-05-05T04:51:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : तालुक्यातील उद्योजक ऋषिनाथ पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे सोमवारी रत्नागिरी नगरपरिषदेच्या स्मशानभूमीसाठी सुमारे ...

मृत कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी २५ टन लाकूड दिले मोफत
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : तालुक्यातील उद्योजक ऋषिनाथ पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे सोमवारी रत्नागिरी नगरपरिषदेच्या स्मशानभूमीसाठी सुमारे २५ टन इतके लाकूड मोफत देण्यात आले. सोमवारी दुपारी १ वाजता वाघ्रट येथून हे लाकूड घेऊन ट्रक रत्नागिरी दिशेने रवाना झाले.
सद्य:स्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत मृत्यू होणाऱ्या नागरिकांवर, लोकांवर रत्नागिरी नगरपरिषदेच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता जाणवत होती. ही गोष्ट समजल्यानंतर दादा पत्याणे यांनी आपल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून व स्वखर्चातून रत्नागिरी परिषदेच्या स्मशानभूमीसाठी मोफत २५ टन लाकडे देण्याचा संकल्प सोडला होता.
तालुक्यातील वाघ्रट येथून लाकडे घेऊन दोन वाहने साेमवारी रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिनाथ पत्याणे, नितीश पत्याणे, सुनील पत्याणे, प्रमिल पत्याणे, संतोष पत्याणे, पुनस गावचे सरपंच इलियास बंदरी, विनोद सावंत, सुभाष जाधव, कोटगावचे उपसरपंच नंदकुमार आग्रे, रवींद्र पाष्टे, चांदोर गावचे पोलीस पाटील प्रवीण मेस्त्री, महेंद्र शेलार उपस्थित होते.
...........................
लांजा तालुक्यातील वाघ्रट येथील ऋषिनाथ पत्याणे यांच्या स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीसाठी लाकूडसाठा देण्यात आला.