शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणाचा तिढा अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:52 IST

रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

ठळक मुद्देकुवारबावमध्ये पोलीस बंदोबस्तात जमीन मोजणी- व्यापारी संघ प्रतिनिधींनी घेतली गडकरींची भेट- ३० मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत आग्रह कायम

रत्नागिरी : रत्नागिरी-नागपूर महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरीतील साळवी स्टॉप ते हातखंबा तिठ्यापर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी ३० मीटर की ४५ मीटर जागा घेतली जाणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

व्यापारी संघ प्रतिनिधींनी नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेतल्यानंतरही आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. सायंकाळपर्यंत कोणताही आदेश न आल्याने महामार्ग विभागाने प्रशासनाच्या मदतीने ७०० मीटर लांबीच्या कुवारबाव येथील रस्त्याची मोजणी केली. उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.साळवी स्टॉप ते हातखंबा या मार्गालगत अनेक बाजारपेठा आहेत. चौपदरीकरणासाठी ४५ मीटर जागा घेतल्यास या बाजारपेठा, घरे यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे ४५ ऐवजी ३० मीटर रुंदीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी कुवारबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी, कार्याध्यक्ष नीलेश लाड व सचिव प्रभाकर खानविलकर यांनी केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी दुपारी १.३० वाजता नवी दिल्ली येथे मंत्रालयातील श्रमशक्ती दालनात भेट घेतली.३० मीटर रस्ता रुंदीकरण करावे या मागणीचे निवेदन मंत्री गडकरी यांना यावेळी देण्यात आले. त्यांच्याशी या शिष्टमंडळाने चर्चा केली. मंत्री गडकरी यांनी याप्रकरणी अधिकाऱ्यांना तत्काळ पडताळणीचे आदेश दिल्याची माहिती व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दूरध्वनीवरून दिली. मात्र कोणताही आदेश न आल्याने महामार्ग विभाग व प्रशासनाकडून कुवारबाव येथील ७०० मीटर लांबीच्या रस्त्याची ४५ मीटर रुंदीकरणासाठी मोजणी पूर्ण करण्यात आली.मिऱ्या-रत्नागिरी ते हातखंबापर्यंतचा मार्ग हा मुंबई गोवा महामार्गाचा उपमार्ग असून येथे महामार्ग कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ४५ मीटर रुंदीकरणासाठी जागा घेतली गेल्यास कुवारबावसह मार्गालगतच्या सर्वच बाजारपेठा बाधित होणार आहेत. त्यामुळे ४५ ऐवजी ३० मिटर जागा घेण्यात यावी, यासाठी कुवारबाव दशक्रोशीतील जनता आग्रही आहे.

कुवारबाव व्यापारीस संघाने त्यामध्ये पुढाकार घेतला आहे. २२ फेब्रुवारीला होणारी मोजणी रोखण्यासाठी व तीव्र विरोध दर्शविण्यासाठी जेलभरोचा इशाराही देण्यात आला होता. मात्र मोजणीत कोणत्याही प्रकारे अडथळा आणला गेल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे यांनी कुवारबाव येथे स्पष्ट केले. त्यानंतर दिवसभरात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये मोजणी पूर्ण करण्यात आली.कुवारबाव व्यापारी संघाला आशाकुवारबावमध्ये उड्डाणपूल उभारू नये. सध्याच्या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी ३० मीटर रुंदीकरण करावे व बाजारपेठ व घरे वाचवावीत अशी कुवारबाववासियांची मागणी होती. त्यासाठीच व्यापारी संघाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीत मंत्र्यांनी अनुकुलता दाखविली असून ते कुवारबाववासियांची भावना लक्षात घेऊन योग्य न्याय देतील, अशी आशा व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग