शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

CoronaVirus Lockdown : तब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:23 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना लांजा पोलिसांनी अडवून त्यांना जेवणाची सोय केली आहे.

ठळक मुद्देतब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीटपोलिसांची सहृदयता

अनिल कासारे लांजा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना लांजा पोलिसांनी अडवून त्यांना जेवणाची सोय केली आहे.कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद होत चालले असताना कोरोनाचा प्रसार थांबविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान यांनी भारत देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. यानंतर मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. काम गेल्याने आता करायचे काय ? हातात पैसे नसल्याने पोटाची खळगी भरायची कशी, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी काम करत असलेल्या जागेवरून स्थलांतर करून आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तहान - भूक विसरून आपल्या गावच्या ओढीने कामगार मैलोनमैल पायपीट करत आहेत.हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे काम बंद झाल्याने त्यांना आपल्या मालकांनी वाऱ्यावर सोडल्याने आता करायचे काय? काम गेले, येथे राहूनदेखील काम नाही. अजून असलेले लॉकडाऊन पुढे किती दिवस चालू राहील, याचा अंदाज नसल्याने त्यांनी गावच रस्ता धरला. गोवा येथून दीपक रामलाल सावू (वय ३५), प्रकाश किसन धुमाळे (वय ५५), तसेच कणकवली येथून राजेश वसंत गावडे (वय ५०), विक्रम वसंत परब (वय ३०) यांनी आठ दिवसांपासून पायी चालायला सुरुवात केली.

रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तहान भूक हरपलेल्या या लोकांनी रस्ता कापण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी आसऱ्याला थांबून सकाळी पुन्हा चालायला सुरूवात करत होते. असे करत ते पुढे पुढे जात होते. गेले आठ दिवस मिळणारे पाणी पिवून जवळपास २०० ते २५० किलोमीटर अंतर त्यांनी कापले होते.लांजा तालुक्यातील मठ येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू ओढवला. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळुंखे हे मंगळवारी दुपारी भेटीसाठी मठ येथे जात होते. त्याचवेळी त्यांना आंजणारी घाटात चार लोक चालत चालले असल्याचे लक्षात आले. त्यांनी लांजा पोलीस स्थानकात संपर्क साधून कल्पना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती सांभाळणारे पोलीस हवालदार नितीन पवार यांनी चालक चेतन घडशी यांना घेऊन आंजणारी गाठली.

तेथून या चारही लोकांना गाडीमध्ये घेऊन लांजा पोलीस स्थानकात आणले. त्यांची चौकशी केली असता गेले आठ दिवस या लोकांना जेवण मिळाले नव्हते. नितीन पवार यांनी या चारही लोकांना पोटभर जेवण दिले. तुम्ही कुठून कुठे जात आहात, याची चौकशी केली असता गोव्याहून पनवेल येथे जाणार आहोत, असे सांगताच पवार यांना धक्का बसला.

साधारण चार जणांपैकी दोघेजण हे ५० व ५५ वर्षांचे आहेत. एवढ्या वयाच्या माणसाने उपाशीपोटी एवढे अंतर कापणे अशक्य आहे. मात्र, जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची सवय असलेल्या या प्रौढांनी तरूणांना लाजवेल, एवढे अंतर कापण्याचा जणू काही विक्रम केला आहे.आश्वासनानंतरहीलांजा पोलिसांनी या चारही जणांचा अहवाल लांजा तहसीलदार वनीता पाटील यांच्याकडे दिला आहे. जे लोक अडकून पडले आहेत, त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलेले असतानाही कामगारांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावाकडे जाताना रस्तोरस्ती दिसून येत आहे.पोलिसांची सहृदयतागोव्याहून चालत आलेले चौघेजण आठ दिवस उपाशी असल्याचे समजल्यानंतर लांजा पोलीस नितीन पवार यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. एकूणच पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण वाढलेला असतानाही पोलिसांनी दाखवलेल्या या सहृदयतेची चर्चा लांजात सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी