शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : तब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:23 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना लांजा पोलिसांनी अडवून त्यांना जेवणाची सोय केली आहे.

ठळक मुद्देतब्बल आठ दिवस अन्नाशिवायच त्या चारजणांनी केली २00 किलोमीटरची पायपीटपोलिसांची सहृदयता

अनिल कासारे लांजा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने पोट भरायचे कसे, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. गोव्यातून पनवेल येथे पायी चालत जाणाऱ्या चार जणांना लांजा पोलिसांनी अडवून त्यांना जेवणाची सोय केली आहे.कोरोनाचे संकट दिवसागणिक गडद होत चालले असताना कोरोनाचा प्रसार थांबविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान यांनी भारत देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. यानंतर मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. काम गेल्याने आता करायचे काय ? हातात पैसे नसल्याने पोटाची खळगी भरायची कशी, या विवंचनेत सापडलेल्या कामगारांनी काम करत असलेल्या जागेवरून स्थलांतर करून आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तहान - भूक विसरून आपल्या गावच्या ओढीने कामगार मैलोनमैल पायपीट करत आहेत.हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे काम बंद झाल्याने त्यांना आपल्या मालकांनी वाऱ्यावर सोडल्याने आता करायचे काय? काम गेले, येथे राहूनदेखील काम नाही. अजून असलेले लॉकडाऊन पुढे किती दिवस चालू राहील, याचा अंदाज नसल्याने त्यांनी गावच रस्ता धरला. गोवा येथून दीपक रामलाल सावू (वय ३५), प्रकाश किसन धुमाळे (वय ५५), तसेच कणकवली येथून राजेश वसंत गावडे (वय ५०), विक्रम वसंत परब (वय ३०) यांनी आठ दिवसांपासून पायी चालायला सुरुवात केली.

रणरणत्या उन्हाची पर्वा न करता तहान भूक हरपलेल्या या लोकांनी रस्ता कापण्यास सुरुवात केली. रात्रीच्या वेळी आसऱ्याला थांबून सकाळी पुन्हा चालायला सुरूवात करत होते. असे करत ते पुढे पुढे जात होते. गेले आठ दिवस मिळणारे पाणी पिवून जवळपास २०० ते २५० किलोमीटर अंतर त्यांनी कापले होते.लांजा तालुक्यातील मठ येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू ओढवला. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळुंखे हे मंगळवारी दुपारी भेटीसाठी मठ येथे जात होते. त्याचवेळी त्यांना आंजणारी घाटात चार लोक चालत चालले असल्याचे लक्षात आले. त्यांनी लांजा पोलीस स्थानकात संपर्क साधून कल्पना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती सांभाळणारे पोलीस हवालदार नितीन पवार यांनी चालक चेतन घडशी यांना घेऊन आंजणारी गाठली.

तेथून या चारही लोकांना गाडीमध्ये घेऊन लांजा पोलीस स्थानकात आणले. त्यांची चौकशी केली असता गेले आठ दिवस या लोकांना जेवण मिळाले नव्हते. नितीन पवार यांनी या चारही लोकांना पोटभर जेवण दिले. तुम्ही कुठून कुठे जात आहात, याची चौकशी केली असता गोव्याहून पनवेल येथे जाणार आहोत, असे सांगताच पवार यांना धक्का बसला.

साधारण चार जणांपैकी दोघेजण हे ५० व ५५ वर्षांचे आहेत. एवढ्या वयाच्या माणसाने उपाशीपोटी एवढे अंतर कापणे अशक्य आहे. मात्र, जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची सवय असलेल्या या प्रौढांनी तरूणांना लाजवेल, एवढे अंतर कापण्याचा जणू काही विक्रम केला आहे.आश्वासनानंतरहीलांजा पोलिसांनी या चारही जणांचा अहवाल लांजा तहसीलदार वनीता पाटील यांच्याकडे दिला आहे. जे लोक अडकून पडले आहेत, त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिलेले असतानाही कामगारांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावाकडे जाताना रस्तोरस्ती दिसून येत आहे.पोलिसांची सहृदयतागोव्याहून चालत आलेले चौघेजण आठ दिवस उपाशी असल्याचे समजल्यानंतर लांजा पोलीस नितीन पवार यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून दिली. एकूणच पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण वाढलेला असतानाही पोलिसांनी दाखवलेल्या या सहृदयतेची चर्चा लांजात सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी