शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रिफायनरीचा बळी देऊन रचला युतीचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 16:47 IST

निसर्गसंपन्न असलेल्या कोकणात आंबा, काजू आणि मासळी यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला मर्यादा असल्याची बाब गेल्या काही वर्षात प्रकर्षाने पुढे आली आहे. मात्र, तरीही याच कारणांसाठी कोकणात विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या प्रकल्पांना सातत्याने विरोध केला जात आहे.

ठळक मुद्देरिफायनरीचा बळी देऊन रचला युतीचा पायास्थानिक भाजपची बोटचेपी भूमिका

रत्नागिरी : निसर्गसंपन्न असलेल्या कोकणात आंबा, काजू आणि मासळी यातून मिळणाऱ्या उत्पन्नाला मर्यादा असल्याची बाब गेल्या काही वर्षात प्रकर्षाने पुढे आली आहे. मात्र, तरीही याच कारणांसाठी कोकणात विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात येऊ घातलेल्या प्रकल्पांना सातत्याने विरोध केला जात आहे.

तब्बल तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणार असलेला रिफायनरी प्रकल्पाचा तर युतीसाठी बळी देण्यात आला आहे. कोणतीही साधकबाधक चर्चा न होताच हा प्रकल्प अन्यत्र नेला जाणार आहे. आता प्रतीक्षा आहे ती हे सत्ताधारी पक्ष कोकणाला रोजगार देण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध करणार याचीच.

गेली अनेक वर्षे कोकणातील अर्थव्यवस्था आंबा, काजू, मासळी आणि मनिआॅर्डरवर अवलंबून आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा, काजूपीक दरवर्षी संकटात सापडत आहे. त्यातही खूप कमी बागायतदार केवळ आंबा, काजू व्यवसायावर आपला वर्षभराचा भार सांभाळू शकतात. त्याखेरीज इतर बागायतदारांना अन्य जोडव्यवसायांचा आधार घ्यावा लागतो.

वाढत्या स्पर्धेमुळे मासळीचे प्रमाणही कमी होत आहे. पारंपरिक मच्छिमारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. बदलत्या हवामानाचा फटका मासेमारीलाही वारंवार बसत आहे. मुंबईतील गिरण्या बंद पडल्यानंतर मनिआॅर्डरचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे ज्यावर आजपर्यंत कोकणची अर्थव्यवस्था टिकून होती, त्या गोष्टी आता बाजूलाच पडू लागल्या आहेत.

अर्थव्यवस्था चालवणारे हे पारंपरिक पर्याय बाद होत असल्याने आता नव्या पर्यायांचा विचार करणे गरजेचे झाले आहे. गेल्या काही वर्षात अनेक प्रकल्पांना किंवा प्रकल्पांच्या विस्तारीकरणाला विरोध झाला आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीला कोकणात मर्यादा आल्या आहेत. या साऱ्यामध्ये रिफायनरी प्रकल्पातून आशेचा किरण लोकांसमोर आला होता. मात्र, युतीच्या राजकारणात या प्रकल्पाचा बळी गेला आहे. या प्रकल्पाला जसे विरोधक आहेत, तसे समर्थकही आहेत. समर्थकांनी आपले म्हणणे सरकारसमोर मांडलेही आहे. मात्र, तरीही हा प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये पुन्हा कोकण मागेच राहणार आहे.

स्थानिक भाजपची बोटचेपी भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी आग्रही भूमिका घेतलेली असतानाही स्थानिक पातळीवर मात्र भाजपने फारच बोटचेपी भूमिका घेतली. या प्रकल्पाला १00 टक्के विरोध नाही. अनेक लोक हा प्रकल्प व्हावा, यासाठी आग्रही आहेत, हे समजूनही भाजपने त्यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

जनजागृतीचे काही लाखांचे कंत्राट पदरात पडूनही भाजपच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी लोकांपर्यंत जाण्याची तसदी घेतली नाही. सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी गेल्या काही दिवसात या प्रकल्पासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातून तेवढेही प्रयत्न झाले नाहीत.

रिफायनरीबाबत अनेक गैरसमज

रिफायनरी प्रकल्पात नेमके काय होणार आहे, याची माहितीच अनेकांना नाही. हा प्रकल्प प्रदूषणकारी आहे, या प्रकल्पात ऊर्जानिर्मिती होणार आहे, आसपासच्या आंबा पिकावर प्रतिकूल परिणाम होतील, या प्रकल्पामुळे मासेमारीवर परिणाम होईल, अशा पद्धतीचे असंख्य गैरसमज आहेत.

या प्रकल्पात ऊर्जानिर्मिती करण्याचा कोणताच प्रस्ताव नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जवळच १0 हजार मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प होत असताना आणखी वीजनिर्मितीची गरज नाही, असेही याआधीच स्पष्ट झाले आहे. मात्र, तरीही या मुद्द्यांवर लोकांमध्ये गैरसमज पसरवला गेला आहे.

विस्तारलेल्या तंत्रज्ञानामुळे या प्रकल्पातून प्रदूषण होणार नाही, धूर बाहेर सोडला जाणार नाही, वापरलेले पाणी समुद्रात सोडले जाणार नाही (ते कंपनी परिसरातील लागवडीमध्येच वापरले जाईल) असे कंपनीने लोकांसमोर मांडले असूनही, गैरसमज तीव्रतेने पसरवले गेले आहेत.

‘त्यां’ची जबाबदारी वाढली

हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याचे लोकांसमोर मांडण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी राजापूर तालुक्याचे दौरे करत होते. आता हा प्रकल्प रद्द झाल्यानंतर त्यांची जबाबदारी वाढली आहे. पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प रद्द करण्यास ज्यांनी भाग पाडले, त्यांनी आता पर्यावरणपूरक उद्योग कोकणात येण्यासाठी सरकारला भाग पाडावे किंबहुना तसे प्रस्ताव तरी सरकारसमोर मांडावेत, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी