शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: टेरव येथील कोळसा भट्ट्यांवर वन विभागाच्या धाडी, तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 16:21 IST

४७ घनमीटर लाकूड जप्त

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील ग्रामस्थांनी गावातील कोळसा भट्ट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामस्थांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर वन विभागाने टेरव येथील जंगलात धुमसत असणाऱ्या कोळसा भट्ट्यांवर धाडी टाकल्या. या धाडीत तेथील लाकूडसाठा आणि कोळसा जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेरव येथील जंगलात अनेक महिने कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची तक्रार केली जात होती. दरवर्षी पावसाळ्यानंतर या जंगलात कोळसा भट्ट्या लावल्या जातात. त्यामुळे गावातील काही जागरूक ग्रामस्थांनी याविरोधात आवाज उठवला होता. वन विभागाला लेखी निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतरही त्याकडे कानाडोळा केला जात होता. मात्र, ग्रामस्थ कारवाईसाठी ठाम होते. त्यानुसार वन विभागाने शनिवार, ३० नोहेंबर रोजी टेरव येथील जंगलामध्ये कोळसा भट्ट्यांवर धाड टाकली.

या धाडीत कोळसा जप्त करण्यात आला. टेरव येथील संतोष कदम, बाबुराव कदम आणि नागेश कदम या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष कदम यांनी विनापरवाना जंगलतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून ४७ घनमीटर लाकूड जप्त केले आहे.कोळसा भट्टी लावण्यास बंदी असतानाही कोळसा भट्ट्या लावल्याप्रकरणी बाबुराव कदम व नागेश कदम यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. येथील परिक्षेत्र वन अधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कोळसा जप्त करण्यात आला असून, कारवाईचा तपशील वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.

टेरव येथे सातत्याने कोळसा भट्ट्या धगधगत आहेत. गतवर्षीही येथे कोळसा भट्ट्या लागल्या असतानाही वन विभागाने त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे कोळसा भट्ट्यांबाबत टेरव ग्रामस्थ आक्रमक होते. आता कारवाईनंतर या भट्ट्या कायमस्वरूपी विझणार की पुन्हा धगधगणार? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग