शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

पुराखाली असलेल्या बाजारपेठेने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

राजापूर : तालुक्यात गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार सायंकाळपासून विश्रांती घेतल्याने, अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ...

राजापूर : तालुक्यात गेले काही दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार सायंकाळपासून विश्रांती घेतल्याने, अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. पात्र नियमित पातळीला आले असून, शहर बाजारपेठेतील पुराचे पाणी तीन दिवसांनंतर ओसरले आहे. पुरामुळे विस्कळीत झालेले शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे, तर तब्बल तीन दिवस पुराखाली असलेल्या शहर बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला आहे.

राजापूर शहर आणि तालुका परिसरात चौदा दिवस संततधार पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला. पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवार ते शुक्रवार असे तीन दिवस पुराच्या पाण्याने शहरात तळ ठोकला होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे कोलमडलेले जनजीवन पूर्ववत सुरू झाले. शहर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली दुकानांची नव्याने मांडणी केली. बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. शहरात भरलेल्या पुरामुळे बाजारपेठ, वरचीपेठ, शिवाजीपथ, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला होता. या भागात राजापूर नगरपरिषदेकडून चिखल काढणे व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली हाेती.