शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Ratnagiri: राजापुरात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By मनोज मुळ्ये | Updated: July 25, 2023 17:21 IST

जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत

राजापूर : तालुक्यात रविवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात तळ ठोकल्याने रविवारी बंद ठेवण्यात आलेली जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे.तालुक्यातील राजापूर शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव रस्त्यावरील पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूकही पूर्ववत सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, तरीही पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला व या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली होती. गेले पाच दिवस राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती कायम होती. त्यामुळे प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले हे ‘ऑन फिल्ड’ परिस्थितीवर जातीनिशी लक्ष ठेऊन होते.मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पुराच्या पाण्याची पातळी ओसरली आहे. सोमवारपासून दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले असून, जवाहर चौकातील एसटी वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पूर ओसरताच नगर परिषद प्रशासनाकडूनही शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.तालुक्यात काही पडझडीच्या घटना घडल्या असून, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार शीतल जाधव यांनी दिल्या आहेत. धाऊलवल्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेमधून बांधून पूर्ण झालेल्या सुनंदा कृष्णा तिर्लोटकर यांच्या घरावर कलमाचे झाड कोसळले व त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर