शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

Ratnagiri: राजापुरात पूर ओसरला, जनजीवन पूर्वपदावर

By मनोज मुळ्ये | Updated: July 25, 2023 17:21 IST

जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत

राजापूर : तालुक्यात रविवारी रात्रीपासून संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अर्जुना आणि कोदवलीच्या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात तळ ठोकल्याने रविवारी बंद ठेवण्यात आलेली जवाहर चौकातील एसटी वाहतूक सोमवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे.तालुक्यातील राजापूर शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव रस्त्यावरील पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूकही पूर्ववत सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, तरीही पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला व या पुराच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली होती. गेले पाच दिवस राजापुरात पूरसदृश्य परिस्थिती कायम होती. त्यामुळे प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले हे ‘ऑन फिल्ड’ परिस्थितीवर जातीनिशी लक्ष ठेऊन होते.मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे या दोन्ही नद्यांच्या पुराच्या पाण्याची पातळी ओसरली आहे. सोमवारपासून दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले असून, जवाहर चौकातील एसटी वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पूर ओसरताच नगर परिषद प्रशासनाकडूनही शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.तालुक्यात काही पडझडीच्या घटना घडल्या असून, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार शीतल जाधव यांनी दिल्या आहेत. धाऊलवल्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रधान मंत्री घरकुल आवास योजनेमधून बांधून पूर्ण झालेल्या सुनंदा कृष्णा तिर्लोटकर यांच्या घरावर कलमाचे झाड कोसळले व त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर