शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी पूर: जिल्ह्यातील पूरस्थिती आटोक्यात; दूध, भाजी, इंधनाची मात्र टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:46 IST

रत्नागिरी जिल्ह्यात २ ऑगस्टपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने खेड, चिपळूण, राजापूर तालुक्यातील पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत झाले आहे. मात्र, कोल्हापूर, सांगली, सातारा येथे मुसळधार पाऊस सुरूच असल्याने  दूध, भाजी आणि पेट्रोल - डिझेलच्या गाड्या जिल्ह्यात येऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे दूध, भाजी आणि इंधनाची टंचाई जाणवू लागली आहे. तर रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे डोंगराला भेगा गेल्याने येथील लोकांना  स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात २ ऑगस्टपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेड, चिपळूण आणि राजापूर शहरातील पुराचे पाणी ओसरले आहे. पुराचे पाणी ओसरल्यामुळे शहरातील जनजीवन पूर्ववत झाले असून, व्यापाऱ्यांनी दुकानातील घाण साफसफाई करण्यास सुरूवात केली आहे. तर नागरिकांनी पुराच्या पाण्यामुळे आलेला चिखल साफ करण्याचे काम हाती घेतले आहे.मंडणगड, दापोली, गुहागर सुरळीततालुक्यात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतल्याने मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यातील जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, बससेवाही सुरू करण्यात आली आहे.कराड, सांगली, सातारा बससेवा बंदचदोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने चिपळूण शहरातील पुराचे पाणी बुधवारपासून ओसरू लागल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. शहरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. दुकानदारांनीदेखील आपली दुकाने सुरू केली आहेत. शहरातील बससेवा सुरू करण्यात आली असली तरी पावसामुळे कराड, सांगली, सातारा मार्गावरील बससेवा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी, गुहागर या मार्गावरील बससेवा सुरू करण्यात आली आहे. दूध व भाजीपाल्याची वाहने न आल्याने शहरात त्याची टंचाई जाणवू लागली आहे.लांजात डिझेलचा तुटवडातालुक्यातील जनजीवन सुरळीत झाले असले तरी डिझेलच्या गाड्या तालुक्यात न आल्याने बससेवेवर परिणाम झाला आहे. तालुक्यातील काही फेऱ्या डिझेलअभावी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसणार आहे.राजापुरात पिण्यासाठी पाणी नाहीअर्जुना आणि कोदवली नदीला आलेल्या पुरामुळे राजापूर शहरात पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेपर्यंत आले होते. त्यामुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारपेठेतील पाणी ओसरले आहे. त्यामुळे दुकानदार तसेच नागरिकांनी साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. दुकाने व घरात आलेला चिखल साफ करण्याचे काम सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना पुरवठा करणाºया पिण्याची पाण्याची यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नसल्याची अवस्था आहे.रत्नागिरीत डोंगराला भेगारत्नागिरी तालुक्यातील कोळंबे वरचीवाडी येथील डोंगराला भेगा पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एक घर प्रभावित होण्याची शक्यता आहे. येथील कुटुंबाला स्थलांतर करण्याच्या लेखी सूचना प्रशानातर्फे देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील चांदेराई, हातिस, पोमेंडी या भागातील पुराचे पाणीही ओसरल्याने ग्रामस्थांनी आपल्या दैनंदिन कामांना सुरूवात केली आहे. रत्नागिरीत डिझेल, पेट्रोलच्या गाड्या न आल्याने वाहनचालकांनी पेट्रोलसाठी पेट्रोलपंपावर गर्दी केली होती.

जगबुडीवरील वाहतूक सुरूखेड तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, पुराचे पाणी ओसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. खेड शहरातीलही जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरRainपाऊस