शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:34 IST

लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान

ठळक मुद्देही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान उड्डानाला ‘ब्रेक’ लागला आहे.

सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकारने  ‘उडान’ योजनेद्वारे बंद पडलेले विमानतळ व धावपट्ट्यांचे काम करून तेथून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या तीन टप्प्यात राज्यातील नाशिक, नांदेड, कोल्हापूर व जळगाव या विमानतळांवरून सामान्यांना परवडेल, अशी सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर ‘उडान ३.१’ची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावरच ही घोषणा करण्यात आल्याने या योजनेला आचारसंहितेचा फटका बसला आहे.

‘उडान ३.१’मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी सरकारी अलायन्स इंडिया या कंपनीने तयारी दर्शविली होती. कंपनीने ही तयारी दर्शवली असली तरी आचारसंहितेमुळे हे काम रखडले आहे. मात्र, पुण्याहून कोकणात सेवा देण्यासाठी कोणतीच कंपनी तयार नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरी विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. पण आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबले आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली. ‘उडान’च्या नियमानुसार कोकणची विमानसेवा त्यानंतर सहा महिन्यात अर्थात ८ सप्टेंबरपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, आता हे काम आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ तयार

सिंधुदुर्गचा विमानतळ सध्या तयार आहे.  मात्र, रत्नागिरी विमानतळाचा विकास साधण्यासाठी आधीच एक महिना उलटून गेला आहे. निवडणूक संपण्यास आणखी किमान दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे ही योजना सद्यस्थितीत रखडलेली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग