शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:34 IST

लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान

ठळक मुद्देही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान उड्डानाला ‘ब्रेक’ लागला आहे.

सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकारने  ‘उडान’ योजनेद्वारे बंद पडलेले विमानतळ व धावपट्ट्यांचे काम करून तेथून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या तीन टप्प्यात राज्यातील नाशिक, नांदेड, कोल्हापूर व जळगाव या विमानतळांवरून सामान्यांना परवडेल, अशी सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर ‘उडान ३.१’ची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावरच ही घोषणा करण्यात आल्याने या योजनेला आचारसंहितेचा फटका बसला आहे.

‘उडान ३.१’मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी सरकारी अलायन्स इंडिया या कंपनीने तयारी दर्शविली होती. कंपनीने ही तयारी दर्शवली असली तरी आचारसंहितेमुळे हे काम रखडले आहे. मात्र, पुण्याहून कोकणात सेवा देण्यासाठी कोणतीच कंपनी तयार नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरी विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. पण आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबले आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली. ‘उडान’च्या नियमानुसार कोकणची विमानसेवा त्यानंतर सहा महिन्यात अर्थात ८ सप्टेंबरपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, आता हे काम आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ तयार

सिंधुदुर्गचा विमानतळ सध्या तयार आहे.  मात्र, रत्नागिरी विमानतळाचा विकास साधण्यासाठी आधीच एक महिना उलटून गेला आहे. निवडणूक संपण्यास आणखी किमान दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे ही योजना सद्यस्थितीत रखडलेली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग