शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

आचारसंहितेचा विमान उड्डानाला लाल दिवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 11:34 IST

लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान

ठळक मुद्देही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीमुळे रत्नागिरीतील विमानतळाचे काम रखडले आहे. विमान कंपनी सेवा देण्यास तयार असतानाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रत्नागिरीतील विमान उड्डानाला ‘ब्रेक’ लागला आहे.

सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा, यासाठी केंद्र सरकारने  ‘उडान’ योजनेद्वारे बंद पडलेले विमानतळ व धावपट्ट्यांचे काम करून तेथून विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पहिल्या तीन टप्प्यात राज्यातील नाशिक, नांदेड, कोल्हापूर व जळगाव या विमानतळांवरून सामान्यांना परवडेल, अशी सेवा सुरू झाली आहे. त्यानंतर ‘उडान ३.१’ची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या तोंडावरच ही घोषणा करण्यात आल्याने या योजनेला आचारसंहितेचा फटका बसला आहे.

‘उडान ३.१’मध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी सरकारी अलायन्स इंडिया या कंपनीने तयारी दर्शविली होती. कंपनीने ही तयारी दर्शवली असली तरी आचारसंहितेमुळे हे काम रखडले आहे. मात्र, पुण्याहून कोकणात सेवा देण्यासाठी कोणतीच कंपनी तयार नसल्याचे दिसत आहे. रत्नागिरी विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. पण आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे काम थांबले आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली. ‘उडान’च्या नियमानुसार कोकणची विमानसेवा त्यानंतर सहा महिन्यात अर्थात ८ सप्टेंबरपूर्वी सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, आता हे काम आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ तयार

सिंधुदुर्गचा विमानतळ सध्या तयार आहे.  मात्र, रत्नागिरी विमानतळाचा विकास साधण्यासाठी आधीच एक महिना उलटून गेला आहे. निवडणूक संपण्यास आणखी किमान दीड महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे ही योजना सद्यस्थितीत रखडलेली आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखीन विलंब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग