शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वादळाच्या इशाऱ्यामुळे मच्छीमार भीतीच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका ...

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असतानाच दुसरीकडे चक्रीवादळाचे संकट येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आधीच मच्छीमार आर्थिक संकटात असताना आता वादळाने नुकसान झाल्यास ते सोसणार कसे, या काळजीत मच्छीमार पडले आहेत.

दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून, ते पुढे उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. यामुळे १४ मे रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणारे लोक आणि मच्छीमारांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व मच्छीमारांना व नौकांना खोल समुद्रातून किनारी परतण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चालू मासेमारी मोसमामध्ये मच्छीमारांना अनेकदा वादळांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये निसर्ग वादळाने किनारपट्टीवरील मच्छीमारांची कोट्यवधी रुपयांची हानी केली होती. त्याचबरोबर बागायतदार, शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला होता. त्यापूर्वी फयान वादळाने तर मच्छीमारांचे कधीही न भरून येणारे नुकसान केले होते. त्यामध्ये अनेक मच्छीमार दगावले होते. अनेक जण आजपर्यंत बेपत्ता आहेत. अशा प्रकारे अनेकदा आलेल्या वेगवेगळ्या वादळांनी मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकूणच वर्षभरातील वादळी स्थिती आणि कोरोना यांच्यामुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांना रोजच्या जगण्यासाठीही धडपड करावी लागत आहे.