शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

वादळाच्या इशाऱ्यामुळे मच्छीमार भीतीच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका ...

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असतानाच दुसरीकडे चक्रीवादळाचे संकट येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आधीच मच्छीमार आर्थिक संकटात असताना आता वादळाने नुकसान झाल्यास ते सोसणार कसे, या काळजीत मच्छीमार पडले आहेत.

दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून, ते पुढे उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. यामुळे १४ मे रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणारे लोक आणि मच्छीमारांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व मच्छीमारांना व नौकांना खोल समुद्रातून किनारी परतण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चालू मासेमारी मोसमामध्ये मच्छीमारांना अनेकदा वादळांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये निसर्ग वादळाने किनारपट्टीवरील मच्छीमारांची कोट्यवधी रुपयांची हानी केली होती. त्याचबरोबर बागायतदार, शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला होता. त्यापूर्वी फयान वादळाने तर मच्छीमारांचे कधीही न भरून येणारे नुकसान केले होते. त्यामध्ये अनेक मच्छीमार दगावले होते. अनेक जण आजपर्यंत बेपत्ता आहेत. अशा प्रकारे अनेकदा आलेल्या वेगवेगळ्या वादळांनी मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकूणच वर्षभरातील वादळी स्थिती आणि कोरोना यांच्यामुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांना रोजच्या जगण्यासाठीही धडपड करावी लागत आहे.