शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

वादळाच्या इशाऱ्यामुळे मच्छीमार भीतीच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका ...

रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असतानाच दुसरीकडे चक्रीवादळाचे संकट येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आधीच मच्छीमार आर्थिक संकटात असताना आता वादळाने नुकसान झाल्यास ते सोसणार कसे, या काळजीत मच्छीमार पडले आहेत.

दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून, ते पुढे उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. यामुळे १४ मे रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणारे लोक आणि मच्छीमारांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व मच्छीमारांना व नौकांना खोल समुद्रातून किनारी परतण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चालू मासेमारी मोसमामध्ये मच्छीमारांना अनेकदा वादळांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये निसर्ग वादळाने किनारपट्टीवरील मच्छीमारांची कोट्यवधी रुपयांची हानी केली होती. त्याचबरोबर बागायतदार, शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला होता. त्यापूर्वी फयान वादळाने तर मच्छीमारांचे कधीही न भरून येणारे नुकसान केले होते. त्यामध्ये अनेक मच्छीमार दगावले होते. अनेक जण आजपर्यंत बेपत्ता आहेत. अशा प्रकारे अनेकदा आलेल्या वेगवेगळ्या वादळांनी मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकूणच वर्षभरातील वादळी स्थिती आणि कोरोना यांच्यामुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांना रोजच्या जगण्यासाठीही धडपड करावी लागत आहे.