शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आपला शत्रू कोण आहे ते आधी निश्चित करा, मंत्री उदय सामंत यांचे समन्वय समितीच्या बैठकीत आवाहन

By मनोज मुळ्ये | Updated: January 11, 2024 15:00 IST

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत

रत्नागिरी : अनेकदा आपण आपापसातच भांडत बसतो. मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत. त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे, असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक गुरुवारी रत्नागिरीमध्ये झाली. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी सर्वांना एकत्र पुढे जाण्याचे आवाहन केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान पदावर पाहण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. त्यासाठीच मिशन ४८ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर सर्वांचा उद्देश एकच आहे तर सर्वांनी एकत्र राहूनच काम करायला हवे, असे ते म्हणाले. आपापसात काही मतेमतांतरे असतील तरी आपापल्या पक्षाच्या समन्वयकामार्फत त्यावर तोडगा काढायला हवा. महायुती ही केवळ लोकसभेसाठी नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गटापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वजण एकत्र राहिलो तर प्रत्येक ठिकाणी विजय फक्त आपलाच होईल. विरोधक नावालाही शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.या बैठकीमध्ये भाजपाकडून समन्वयक म्हणून प्रमोद जठार, शिवसेनेकडून समन्वयक म्हणून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून समन्वयक म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित होते. तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.महायुती राज्यस्तरावर आहे. मात्र ग्रामीण पातळीवर अजूनही समन्वय झालेला नाही, यासह अनेक मुद्दे महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मांडले. ग्रामपातळीवरही समन्वय तयार व्हायला हवा, यासाठी जिल्हा समन्वय समिती आणि तालुका पातळीवरही समन्वय समिती कार्यरत राहील असे यावेळी निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत