शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

आपला शत्रू कोण आहे ते आधी निश्चित करा, मंत्री उदय सामंत यांचे समन्वय समितीच्या बैठकीत आवाहन

By मनोज मुळ्ये | Updated: January 11, 2024 15:00 IST

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत

रत्नागिरी : अनेकदा आपण आपापसातच भांडत बसतो. मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत. त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे, असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक गुरुवारी रत्नागिरीमध्ये झाली. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी सर्वांना एकत्र पुढे जाण्याचे आवाहन केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान पदावर पाहण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. त्यासाठीच मिशन ४८ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर सर्वांचा उद्देश एकच आहे तर सर्वांनी एकत्र राहूनच काम करायला हवे, असे ते म्हणाले. आपापसात काही मतेमतांतरे असतील तरी आपापल्या पक्षाच्या समन्वयकामार्फत त्यावर तोडगा काढायला हवा. महायुती ही केवळ लोकसभेसाठी नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गटापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वजण एकत्र राहिलो तर प्रत्येक ठिकाणी विजय फक्त आपलाच होईल. विरोधक नावालाही शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.या बैठकीमध्ये भाजपाकडून समन्वयक म्हणून प्रमोद जठार, शिवसेनेकडून समन्वयक म्हणून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून समन्वयक म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित होते. तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.महायुती राज्यस्तरावर आहे. मात्र ग्रामीण पातळीवर अजूनही समन्वय झालेला नाही, यासह अनेक मुद्दे महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मांडले. ग्रामपातळीवरही समन्वय तयार व्हायला हवा, यासाठी जिल्हा समन्वय समिती आणि तालुका पातळीवरही समन्वय समिती कार्यरत राहील असे यावेळी निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत