शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आपला शत्रू कोण आहे ते आधी निश्चित करा, मंत्री उदय सामंत यांचे समन्वय समितीच्या बैठकीत आवाहन

By मनोज मुळ्ये | Updated: January 11, 2024 15:00 IST

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत

रत्नागिरी : अनेकदा आपण आपापसातच भांडत बसतो. मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत. त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे, असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक गुरुवारी रत्नागिरीमध्ये झाली. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी सर्वांना एकत्र पुढे जाण्याचे आवाहन केले.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान पदावर पाहण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. त्यासाठीच मिशन ४८ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर सर्वांचा उद्देश एकच आहे तर सर्वांनी एकत्र राहूनच काम करायला हवे, असे ते म्हणाले. आपापसात काही मतेमतांतरे असतील तरी आपापल्या पक्षाच्या समन्वयकामार्फत त्यावर तोडगा काढायला हवा. महायुती ही केवळ लोकसभेसाठी नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गटापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वजण एकत्र राहिलो तर प्रत्येक ठिकाणी विजय फक्त आपलाच होईल. विरोधक नावालाही शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.या बैठकीमध्ये भाजपाकडून समन्वयक म्हणून प्रमोद जठार, शिवसेनेकडून समन्वयक म्हणून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून समन्वयक म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित होते. तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.महायुती राज्यस्तरावर आहे. मात्र ग्रामीण पातळीवर अजूनही समन्वय झालेला नाही, यासह अनेक मुद्दे महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मांडले. ग्रामपातळीवरही समन्वय तयार व्हायला हवा, यासाठी जिल्हा समन्वय समिती आणि तालुका पातळीवरही समन्वय समिती कार्यरत राहील असे यावेळी निश्चित करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत