शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

..अखेर आश्वासनानंतर आंबा बागायतदारांचे आमरण उपोषण मागे 

By मेहरून नाकाडे | Updated: December 16, 2023 18:58 IST

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत आंदोलन मागे घेण्याचे केले आवाहन

रत्नागिरी: आंबा,काजू बागायतदरांचे कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असले तरी माजी आमदार बाळ माने, जि.प.चे माजी अध्यक्ष उदय बने, माजी सभापती परशुराम कदम यांनी पुढाकर घेत मंत्र्यांच्या माध्यमातून मागण्या मान्य करुन घेवू असे आश्वासन दिले. आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी रामचंद्र मोहिते यांना बाळ माने, उदय बने यांनी सरबत देवून उपोषण थांबविले.गेल्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर आंबा, काजू बागायतदारांचे हे आंदोलन सुरू होते. करबुडे येथील आंबा बागायतदार शेतकरी रामचंद्र मोहिते आमरण उपोषणास बसले होते. इतर बागायतदारांनी आंदोलनास पाठीबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. उपोषणाच्या माध्यमातून बागायतदारांची रास्त मागणी ऐकून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या आठवडाभरात आंदोलनकर्त्यां बागायतदारांची बाजू कुणीही ऐकून घेण्यास पुढे सरसावलेले नव्हते. शनिवारी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या माध्यामातून आंबा, काजू बागायतदारांच्या प्रश्न सोमवारी विधानसभेत आवाज उठवला जाईल, तुम्ही आंदोलन मागे घ्या असे आवाहन केल्यानंतरच आंदोलकांचे नेते प्रकाश साळवी यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावेळी माजी सभापती परशुराम कदम, बागायतदार संघटनेचे प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन