शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

दापोलीच्या रणांगणात अनिल परब-रामदास कदम यांचे शीतयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 12:17 IST

निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : दापोली आणि मंडणगडमधील नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री अनिल परब आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील शीतयुद्ध रंगू लागले आहे. निवडणुकीची सूत्रे आमदार योगेश कदम यांच्याकडून काढून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्याची अनिल परब यांची पहिली चाल यशस्वी झाली आहे. मात्र, त्यात नाराज झालेल्या शिवसैनिकांना सोबत घेत आमदार योगेश कदम आपली चाल खेळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी केलेल्या पाठपुराव्याचा मोठा फटका पालकमंत्री अनिल परब यांना सहन करावा लागला. या साऱ्या प्रकरणात परब यांच्यावर शिंतोडे उडाले आहेत. सोमय्या यांना या रिसॉर्टबाबत माहिती पुरवण्यात शिवसेना नेते रामदास कदम यांचाच मोठा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आणि त्यासाठी काही ऑडिओ क्लिपही सादर केल्या. त्यामुळे साहजिकच अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये वितुष्ट आले आहे.

या प्रकरणात अनिल परब किंवा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही बाजू मांडली नसली तरी या साऱ्यामध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांना दोषी मानण्यात येत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकांमधून रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. केवळ त्यांच्या आमदारकीला ब्रेक लावून न थांबता अनिल परब यांनी आता दापोली, मंडणगड नगरपंचायतीची मुख्य सूत्रे सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवून पुढील चाल खेळली आहे.

२०१४ विधानसभेत पराभूत झाल्यानंतर दळवी यांनी आपल्या पराभवाला रामदास कदम यांनाच जबाबदार धरले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकांमध्ये या जागी योगेश कदम यांची वर्णी लागली. त्यामुळे दळवी आणि रामदास कदम, तसेच दळवी आणि योगेश कदम यांच्यामध्ये सख्य नाही. शत्रूच्या शत्रूला मित्र मानण्याचा सिद्धांत येथे लागू झाला आहे. कदम यांच्यावर मात करण्यासाठी परब यांनी सूर्यकांत दळवी यांना जवळ केले आहे.

परब यांची ही चाल यशस्वी झाली असली तरी त्याने शिवसेनेचेच अनेक जण नाराजही झाले आहेत. अशा नाराजांची मोट बांधून योगेश कदम या निवडणुकीत आपले वजन दाखवणार का, असा प्रश्न आता पुढे आला आहे. आता ही लढाई दळवी विरुद्ध कदम, अशी प्रतिष्ठेची होणार असली तरी मुळात ही लढाई परब विरुद्ध कदम, अशीच आहे.

दळवी यांचे पुनरागमन

दापोलीत शिवसेना वाढवण्यात सर्वांत मोठा वाटा सूर्यकांत दळवी यांचा आहे. १९९० पासून सलग पाच निवडणुका जिंकण्याची मोठी कामगिरी दळवी यांनी केली आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप केले. त्यानंतर ते शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. ते भाजपमध्ये जाणार, ते राष्ट्रवादीत जाणार, अशा अनेक चर्चा झाल्या. प्रत्यक्षात ते कोणत्याही पक्षात गेले नसले तरी शिवसेनेत मात्र सक्रिय नव्हते.

दोघांच्या भांडणार लाभ तिसऱ्याचा

परब आणि कदम यांच्यातील वादाचा लाभ सूर्यकांत दळवी यांना झाला आहे. दळवी आणि अनिल परब यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचे आजपर्यंत कधीही समोर आलेले नाही. पालकमंत्री झाल्यानंतर अनिल परब यांनी जुने शिवसैनिक म्हणून दळवी यांना पक्षात परत सक्रिय करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, आता कदम यांना शह देण्यासाठी त्यांनी दळवी यांना पुढे आणले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायतElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाRamdas Kadamरामदास कदमAnil Parabअनिल परब