शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बुलेट ट्रेनमुळे तो करार रद्द झालेला नाही- अनंत गीते यांचे चिपळूण येथे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 13:18 IST

अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली. चिपळूण-कऱ्हाड हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाला आहे, अशी ओरड होत आहे, ती चुकीची आहे.

ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाहीचिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाल्याची ओरड चुकीची १० टप्प्यांमध्ये रेल्वेमार्ग होणार असून, १४ पुलांचे काम सुरु

चिपळूण : अहमदाबाद ते मुंबई या बुलेट ट्रेनमुळे चिपळूण - कऱ्हाड रेल्वे मार्गाचा करार रद्द झालेला नसून, या कामाचे सर्वेक्षण सुरु आहे. हा महत्त्वाकांक्षी करार रद्द झाल्याचे प्रशासनाचे अधिकृत पत्र नाही, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते गुहागर व चिपळूण येथील शिवसेनेच्या कार्यक्रमानिमित्ताने आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, चिपळूण-कऱ्हाड हा रेल्वेमार्ग बुलेट ट्रेनमुळे रद्द झाला आहे, अशी ओरड होत आहे, ती चुकीची आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्याच ठेकेदारांवर सोपवली आहे.

ठेकेदारांनी योग्य पद्धतीने काम न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असून, याबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. १० टप्प्यांमध्ये हे काम होणार असून, १४ पुलांचे काम सुरु आहे. डिसेंबर २०१८पर्यंत झारापपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले असेल, असा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणामध्ये बाधित झालेल्या भूधारकांना वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँक यांच्या सहकार्यातून योग्य तो मोबदला दिला जाईल. निधीची कुठेही कमतरता भासणार नाही. आतापर्यंत ८५ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१८पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे रिफायनरी प्रकल्प येत आहे. या प्रकल्पाचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेRatnagiriरत्नागिरी