कृषी संजीवनी मोहिमेची देवरुखात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:13+5:302021-07-02T04:22:13+5:30
देवरुख : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी देवरुख आणि पंचायत ...

कृषी संजीवनी मोहिमेची देवरुखात सांगता
देवरुख : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी देवरुख आणि पंचायत समिती देवरुख तालुका संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती देवरुख येथे गुरुवारी कृषिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माैजे हातीव येथे चारसूत्री भात लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, तसेच या भागात वृक्षाराेपणाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. मौजे हातीव येथे चारसूत्री भात लागवड पद्धत प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन, जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन व १० टक्के रासायनिक खताची बचत करण्यासाठी शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, जिवाणू संवर्धक, पिकाच्या अवेशषाचा वापर, गिरीपुष्पाचे भातशेतीतील महत्त्व व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रभारी कृषी अधिकारी शिवगण, कृषी पर्यवेक्षक टी.एन. खोत, गटविकास अधिकारी सहायक दीप्ती गाठ, विनोदकुमार शिंदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक समीर दोरकडे व ग्रामसेवक शैलेश खरारे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी कदम, सरपंच नंदकुमार कदम, उपसरपंच शिवगण, तलाठी जयश्री पाटील, ग्रामपंचायत सदस्य क्षितिजा गावडे, पोलीस पाटील जान्हवी गावडे, कृषी सहायक सिसाळ डांगे, तसेच प्रगतिशील शेतकरी आणि इतर, असे एकूण ४५ शेतकरी उपस्थित होते.
010721\img-20210701-wa0107.jpg
चतुसूत्री लागवड प्रात्यक्षिक