शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

कोकणात रुजलाय जगातील सर्वात महाग काळा तांदूळ, अभिषेक सुर्वे याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:52 IST

Agriculture Sector, konkan, rice, farmar, ratnagirinews, कोकणात भातशेती व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचा दावा केला असला तरी त्यात वेगवेगळे प्रयोग झाले तर शेतकरी आणि पर्यायाने कोकणाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे दापोलीच्या अभिषेक सुर्वे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जगात सर्वात महागड्या व शरीराला उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडूनही मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती त्याने दापोलीत केली आहे.

ठळक मुद्देदापोलीतील करंजाळी येथे काळ्या तांदळाच्या शेतीचा प्रयोग यशस्वीकोकणाची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता

दापोली : कोकणात भातशेती व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर नसल्याचा दावा केला असला तरी त्यात वेगवेगळे प्रयोग झाले तर शेतकरी आणि पर्यायाने कोकणाचा आर्थिक विकास होऊ शकतो, हे दापोलीच्या अभिषेक सुर्वे यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. जगात सर्वात महागड्या व शरीराला उपयुक्त असल्यामुळे औषध कंपन्यांकडूनही मागणी असलेल्या काळ्या तांदळाची शेती त्याने दापोलीत केली आहे.दापोली तालुक्यातील करंजाळी येथील अभिषेक सुर्वे या सव्वीस वर्षांच्या तरूणाने हा आदर्श उभा केला आहे. अभिषेक हा दापोली तालुक्यातील करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता. नोकरीचा राजीनामा देऊन तो आता दापोलीत आला आहे.

येथे अन्य काही करण्यापेक्षा त्याने शेतीला प्राधान्य दिले आणि वडिलोपार्जित शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. तो मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला सर्वप्रथम काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

लॉकडाऊन काळात पत्रव्यवहार करून त्याने काळ्या तांदळाचे बियाणे टपालाने मागवले. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे हे बियाणे मिळायला तीन महिन्यांचा अवधी लागला. यामुळे यातील अर्धेअधिक बियाणे खराब होऊन गेले. उरलेले बियाणे अभिषेकने जमिनीत पेरले. आज अभिषेकच्या दारात काळ्या तांदळाची भातशेती चांगली तरारली आहे.या काळ्या तांदळाला मोठ्या शहरांबरोबर परदेशातही मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ किमान चारशे ते पाचशे रुपये किलो दराने विकला जातो. फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन साईटवर या तांदळाची विक्री ३९९ रुपये दराने सुरू असल्याची माहिती यावेळी अभिषेक दिली.काळा तांदूळ हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेच. शिवाय त्याला आरोग्याच्यादृष्टीनेही महत्त्व आहे. कार्बोहायड्रेटयुक्त असलेला हा काळा तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना उपयुक्त आहे. काळ्या तांदळाच्या भातामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने हे पचण्यास उपयुक्त असतात. सोबतच अँटी ऑक्सिडेंट तत्व असल्याने हे डोळ्यांसाठीही उपयुक्त ठरतात. स्वास्थ्यासाठी लाभदायक असल्याने औषध कंपन्यांकडूनही त्याला मोठी मागणी आहे.१५० दिवसात तयारदेशात काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जाते. १५० दिवसांमध्ये हा काळा तांदूळ तयार होतो. काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे त्यापासून बिस्किटे तयार केली जातात. शिवाय शरीर स्वस्त व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो, अशी माहिती अभिषेक सुर्वे यांनी दिली.शेतकऱ्यांना फायदेशीरकोकणामध्ये भातशेती ही तुकड्या - तुकड्यात विखुरली आहे. कोकणामध्ये भात शेतीसाठीच्या अल्प जागेमध्ये तेवढ्यातच श्रमामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांना दहा पट अधिक नफा देणारे हे बियाणे आहे. यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतीतील काही भागात पुढील वषार्पासून काळ्या तांदळाची शेती केल्यास ते कोकणाला वरदान ठरेल, असा विश्वास अभिषेक सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी