शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:49 IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला गती, मात्र काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अत्यंत घाईघाईने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाला वालोपे येथे आतापासूनच खड्डे व तडे गेले आहेत. काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात आला आहे. एकीकडे तडे गेलेली गटारे ढासळलेल्या स्थितीत असतानाच आता काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेलेले नाही. कापसाळ ते खेरशेतदरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणात चांगली प्रगती आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग मिळत आहे.तूर्तास परशुराम घाटात एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दरडीच्या बाजूचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यावर ठेकेदार कंपनीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले परशुराम घाटातील चौपदरीकरण आता हळूहळू पूर्णत्वास जात आहे.  याच जोडीला शहरातील बहादूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.एकूणच चिपळूण हद्दीत चौपदरीकरणाच्या कामास वेग आला असला, तरी काही ठिकाणी अतिशय घाईघाईने काँक्रिटीकरण केले जात आहे. विशेषतः शहरानजीकच्या वालोपे परिसरात नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणास जागोजागी खड्डे पडून तडेही गेले आहेत. त्यावर पाऊस पडताच हे तडे आणखी उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या या परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत.गतवर्षी कामथे घाटमाथ्याच्या जवळच काँक्रिटीकरणाचा काही भाग खचला होता. याविषयी वर्षभर ओरड झाल्यानंतर त्याची दुरूस्ती करण्यात आली. त्याचबरोबर चौदरीकरणाअंतर्गत उभारलेले दुभाजकही अनेक ठिकाणी ढासळले आहेत. कापसाळ येथेही मुख्य काँक्रिटीकरण रस्त्याला समपातळी राहिलेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात घाई नको, असा सूर वाहतूकदारांसह ग्रामस्थांमधूनही उमटू लागला आहे.चौपदरीकरणातील गटारांनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. चिपळूण, कळबंस्ते, वालोपे, कापसाळ येथे काही ठिकाणी गटारे कोसळलेल्या स्थितीत आहेत. तेथे दुरुस्ती गरजेचीच आहे.

पावसाळा येतोयउशिरा सुरू होत असला तरी एकदा सुरू झाल्यानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढतो. त्यामुळे काँक्रिटीकरणाला पडलेले खड्डे वाढण्याची भीती आहे. तसेच वेगात जाणाया वाहनांचा, विशेषत: दुचाकींचा या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा