शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यापूर्वीच पडले काँक्रीटीकरणाला खड्डे, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:49 IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला गती, मात्र काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अत्यंत घाईघाईने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाला वालोपे येथे आतापासूनच खड्डे व तडे गेले आहेत. काही भागात रस्ता खचल्याने निकृष्ट कामाचा उत्तम नमुना उजेडात आला आहे. एकीकडे तडे गेलेली गटारे ढासळलेल्या स्थितीत असतानाच आता काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम सुरू असून, अद्याप ते पूर्णत्वास गेलेले नाही. कापसाळ ते खेरशेतदरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या चौपदरीकरणात चांगली प्रगती आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग मिळत आहे.तूर्तास परशुराम घाटात एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दरडीच्या बाजूचे काम अजूनही शिल्लक आहे. त्यावर ठेकेदार कंपनीने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले परशुराम घाटातील चौपदरीकरण आता हळूहळू पूर्णत्वास जात आहे.  याच जोडीला शहरातील बहादूरशेखनाका ते युनायटेड हायस्कूलदरम्यानच्या उड्डाणपुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.एकूणच चिपळूण हद्दीत चौपदरीकरणाच्या कामास वेग आला असला, तरी काही ठिकाणी अतिशय घाईघाईने काँक्रिटीकरण केले जात आहे. विशेषतः शहरानजीकच्या वालोपे परिसरात नव्याने केलेल्या काँक्रिटीकरणास जागोजागी खड्डे पडून तडेही गेले आहेत. त्यावर पाऊस पडताच हे तडे आणखी उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. सध्या या परिसरातील काँक्रिटीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. परंतु काही ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत.गतवर्षी कामथे घाटमाथ्याच्या जवळच काँक्रिटीकरणाचा काही भाग खचला होता. याविषयी वर्षभर ओरड झाल्यानंतर त्याची दुरूस्ती करण्यात आली. त्याचबरोबर चौदरीकरणाअंतर्गत उभारलेले दुभाजकही अनेक ठिकाणी ढासळले आहेत. कापसाळ येथेही मुख्य काँक्रिटीकरण रस्त्याला समपातळी राहिलेली नाही. अनेक ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात घाई नको, असा सूर वाहतूकदारांसह ग्रामस्थांमधूनही उमटू लागला आहे.चौपदरीकरणातील गटारांनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. चिपळूण, कळबंस्ते, वालोपे, कापसाळ येथे काही ठिकाणी गटारे कोसळलेल्या स्थितीत आहेत. तेथे दुरुस्ती गरजेचीच आहे.

पावसाळा येतोयउशिरा सुरू होत असला तरी एकदा सुरू झाल्यानंतर पावसाचा जोर चांगलाच वाढतो. त्यामुळे काँक्रिटीकरणाला पडलेले खड्डे वाढण्याची भीती आहे. तसेच वेगात जाणाया वाहनांचा, विशेषत: दुचाकींचा या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचीही शक्यता आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गMumbaiमुंबईgoaगोवा