शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी धोरणाविरोधात रत्नागिरीत अभियंत्यांचे आंदोलन

By मेहरून नाकाडे | Updated: April 29, 2025 13:30 IST

रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण , महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार ...

रत्नागिरी : महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंतेसुध्दा आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत आहेत. या अभियंत्यांचे नेतृत्व करणारी सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA) ही संघटना अभियंत्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. या संघटनेने महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी आणि अपारदर्शी धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.शहरातील कोकण परिमंडल कार्यालयासमोर सर्व अभियंत्यांनी एकत्रित येत आंदोलन केले.सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे रत्नागिरीतील सहसचिव नबील मोंगल यांनी, महावितरणातील बदली धोरण, कर्मचारी भरती, स्टाफ सेटअप आणि कंपनीच्या पुनर्रचनेबाबत प्रशासन एकतर्फी निर्णय घेत आहे. यामध्ये अभियंत्यांना विश्वासात घेतले जात नाही, तसेच पारदर्शक धोरणांचा अवलंब केला जात नाही. याचा परिणाम केवळ अभियंत्यांवरच नव्हे, तर वीज ग्राहकांवरही होणार आहे. याविरोधात संघटनेने अभिनव आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार सोडणे, महावितरणच्या मोबाइल क्रमांकावरील कॉल कार्यकारी अभियंत्यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट करणे, प्रशासनाचे व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे, तसेच पेन डाऊन आणि कॉम्प्युटर डाऊन आंदोलनाचा समावेश असल्याचे सांगितले.रत्नागिरीत वर्षानुवर्षे अभियंत्यांच्या रिक्त जागा असून, या जागांचा अतिरिक्त कार्यभार इतर अभियंत्यांवर टाकला जात आहे. आता या आंदोलनात अभियंत्यांनी हा कार्यभार सोडला आहे. तसेच, प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी यासाठी कॉल डायव्हर्टचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन ग्राहकांविरोधात नाही मात्र वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंते रात्रंदिवस कार्यरत असल्याचे संघटनेचे सहसचिव मोंगल यांनी सांगितले.या आंदोलनात रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, लोटे आदी तालुक्यांतील शंभरपेक्षा जास्त अभियंते सहभागी आहेत. संघटनेने वीज ग्राहकांना या आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रशासनाने अभियंत्यांच्या मागण्या मान्य करून पारदर्शक धोरणे राबवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरणagitationआंदोलन